शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live: रतन टाटांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत दाखल, थोड्या वेळात अंत्यसंस्कार
2
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
3
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
4
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
5
मदरश्यांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, खासगी विद्यापीठांना मंजुरी, राज्य मंत्रिमंडळात निर्णयांचा धडाका
6
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
7
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
8
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
9
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
10
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
11
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..
12
PAK vs ENG : मुल्तानमध्ये इंग्लंड 'सुल्तान'! ऐतिहासिक आकडा अन् विश्वविक्रम; भारताचा विक्रम मोडला
13
रिस्क घ्यायची नसेल तर 'या' सरकारी स्कीममध्ये गुंतवा पैसा; रिटायरमेंटपर्यंत व्हाल २,२६,९७,८५७ रुपयांचे मालक
14
इंग्लंड-पाक नव्हे भारत-श्रीलंका लढतीत सेट झालाय कसोटीतील सर्वोच्च धावसंख्येचा वर्ल्ड रेकॉर्ड
15
रतन टाटांसह त्यांच्या भावानेही लग्न केले नाही; सावत्र भाऊ सांभाळतो व्यवसाय, कुटुंबात कोण..?
16
Dussehra 2024: दसर्‍याला आठवणीने करा 'हे' एक काम; वास्तुमध्ये सदैव राहील सुख, संपत्ती, समाधान!
17
PAK vs ENG Live : इंग्लंड ७ बाद ८२३! पाकिस्तानी चाहत्यांना वेदना देणारी 'कसोटी', हॅरी ब्रूकच्या ३१७ धावा
18
एक पंखा, दोन बल्ब आणि टीव्ही..., विजेचं बिल आलं १.९ लाख रुपये, त्रस्त युवकानं उचललं टोकाचं पाऊल  
19
टाटांची जादू : टाटांच्या 'या' शेअरनं १ लाखांचे केले ₹३५ कोटी; गुंतवणूकदार झाले कोट्यधीश
20
सर्वाधिक १० श्रीमंत उमेदवारांमध्ये ७ पुरुष, ३ महिला; सर्व पुरुष हरले, महिला जिंकल्या

कोरोनामुळे बेघर झालेल्या ५८ वर्षीय महिलेला मिळाला निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:43 AM

ठाणे : लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे बेघर झालेल्या आणि तब्बल सहा महिने बस स्टॉपवर गुजराण करीत असलेल्या ५८ वर्षीय महिलेला ठाण्यातील ...

ठाणे : लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीमुळे बेघर झालेल्या आणि तब्बल सहा महिने बस स्टॉपवर गुजराण करीत असलेल्या ५८ वर्षीय महिलेला ठाण्यातील तरुणाईने निवारा मिळवून दिला.

या महिलेचे तौक्ते चक्रीवादळामुळे सर्व सामान भिजून गेले, अगदी डोक्यावर बांधलेले छप्पर देखील उडाले. ठाण्यातील काही तरुण तरुणींच्या नजरेस ही महिला पडली तेव्हा त्यांनी तिची रीतसर माहिती काढून शहानिशा करून ठाणे महापालिका आणि अपूर्वा महिला सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या निवारा केंद्रात दाखल केले. अजय भोसले आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

कमलाबाई दळवी असे या महिलेचे नाव आहे. भाग्यश्री देशमुख हिला त्या प्रथम दिसल्या. बसस्टॉपवर ती सहा महिने त्यांना पाहत होती. पाच दिवसांपूर्वी चक्रीवादळामुळे आलेल्या पावसामुळे तिची झालेली परिस्थिती पाहून तिने विचारपूस केली. त्यावेळी त्यांना कोणीही नसल्याचे तिने सांगितले. पतीचे निधन झाल्यानंतर घरकाम करून ती स्वतःचा उदरनिर्वाह करीत होती. लॉकडाऊनमध्ये त्यांचे काम बंद झाले आणि घरभाडे थकल्याने घरमालकाने खोली खाली करण्यास सांगितले. त्यावेळी त्या हॅप्पी व्हॅली समोरील सहयोग बस स्टॉपसमोर राहायला आल्या. पाऊस आला म्हणून भाग्यश्री त्यांना छत्री द्यायला गेली त्यावेळी वादळ सुटले होते. त्यांना तिने स्वखर्चातून ताडपत्री दिली पण सोसाट्याचा वारा सुटल्याने ते उडून गेले. म्हणून या महिलेसाठी निवारा शोधण्याचे तिने प्रयत्न केले. समता विचार प्रसारक संस्थेचा कार्यकर्ता अजय भोसले याला ही घटना कळल्यानंतर त्याने भाग्यश्रीशी संपर्क साधून त्या महिलेने सांगितलेल्या हकिकतीची सर्वप्रथम शहानिशा केली. पावसात त्यांचे सर्व सामान भिजले असल्याने भाग्यश्रीने स्वखर्चातून त्यांना कपडे, बॅग, खाण्याचे समान विकत घेतले. आरती भोर यांनी त्या महिलेसाठी मोफत ब्लाऊज शिवून दिले. अमोल जाधव हे त्यांच्या जेवणाची सोय करतच होते. त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. त्यांना आश्रमात ठेवण्याचा विचार अजयने केल्यानंतर काही आश्रममधून पैशाची मागणी झाल्याने अजयने तो विचार सोडला. परंतु, हिंमत न हारता शोध सुरू ठेवला. त्याने धर्मवीर आनंद दिघे विचार मंच व सेवाचे संस्थापक जयदीप कोर्डे यांना संपर्क केला त्यावेळी मनपाच्या निवारा केंद्राचा त्यांनी संदर्भ दिला. बुधवारी अजयने दळवी यांना आश्रमात दाखल केले. सुरुवातीला त्यांची मानसिक तयारी नव्हती. व्यवस्थित समजून सांगितल्यावर त्या तयार झाल्याचे अजयने सांगितले. निवारा केंद्राचे व्यवस्थापक संदीप सरदार म्हणाले की, दळवी यांना काही काळ ठेवले जाईल. पुढे चांगल्या ठिकाणी सोय झाल्यावर त्या ठिकाणी पाठवले जाईल. दळवी यांच्याशी संपर्क केल्यावर त्या म्हणाल्या, माझा पहिला दिवस चांगला गेला आहे.

या मदतीसाठी समता विचार प्रसारक संस्था व कार्यकर्ते सायली साळवी, दर्शन पडवळ, इनोक कोलीयर, रवी इसाक, ओम गायकवाड, शुभम कोळी यांनीही मोलाची मदत केल्याचे अजयने सांगितले.

-------------/--