शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

किल्ले संवर्धनासाठी ६०० कोटी , मोदी सरकारकडून लोकहिताची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:50 IST

छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत

कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ज्या पद्धतीने जनतेसाठी काम करत होते, त्याप्रमाणे मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधील मंत्री काम करत असल्याचे सांगत गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकारने ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. शनिवारी पूर्वेकडील नूतन विद्यामंदिर शाळेत भरवण्यात आलेल्या दोनदिवसीय शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.भाजपाचे कल्याण पूर्व सरचिटणीस संजय मोरे आणि संतोष पाटील यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून शस्त्रसंग्रह करणाºया सुनील कदम यांचे या वेळी राज्यमंत्री चव्हाण यांनी विशेष कौतुक केले. शिवाजी महाराज हे कल्याणमध्ये येऊन गेले आहेत. त्यामुळे या शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आरमार आणि किल्ले यासाठी महाराज नेहमी आग्रही होते. त्यांनी केलेली प्रत्येक लढाई ही महत्त्वाची होती. त्यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी विविध शस्त्रांचा वापर करून लढाई जिंकली आहे, असे सांगताना चव्हाण यांनी हा इतिहास समजावा, म्हणून रायगडासह अन्य गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ६०० कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली.लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला होता. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाने ज्याप्रमाणे काम केले, त्याप्रमाणे सध्याचे राज्यातील आणि केंद्रातील सरकार काम करत आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य देशातील नागरिकांना अनुभवाला येईल, असा दावा चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला. या वेळी आयोजक संजय मोरे, नाना सूर्यवंशी, सुभाष म्हस्के, वैभव गायकवाड, हेमलता पावशे, सुमित्रा नायडू, कमल पंजाबी आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी शाळकरी मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

टॅग्स :Fortगड