शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

६२ हजारांचे वीजबिल अखेर २०३ रुपये

By admin | Published: June 25, 2017 3:59 AM

‘महावितरण’च्या वाढीव वीज बिलांप्रश्नी भाजपाच्या कल्याण जिल्ह्याने शुक्रवारी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात अधिकाऱ्यांना घेराव घातला

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ‘महावितरण’च्या वाढीव वीज बिलांप्रश्नी भाजपाच्या कल्याण जिल्ह्याने शुक्रवारी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात अधिकाऱ्यांना घेराव घातला. या वेळी इंदिरानगर झोपडपट्टीतील राजू शिर्के यांना ‘महावितरण’ने ६२ हजार रुपयांचे बील पाठवल्याबद्दल जाब विचारण्यात आला. त्यामुळे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी त्याची तातडीने दखल घेत चौकशी केली. अखेर हे बील २०३ रुपये केल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी दिली.वाढीव बिलांप्रश्नी घेराव घातल्यानंतर शिर्के यांचे बील काही तासांतच ६२ हजारांवरून थेट २०३ इतके कमी करण्यात आले. हे कसे शक्य झाले, असा सवाल कांबळे यांनी केला. भाजपाच्या आंदोलनामुळे शिर्के यांना दिलासा मिळाला असला तरी असा सावळा गोंधळ किती जणांच्या बाबतीत असेल? ‘महावितरण’च्या हलगर्जीमुळे अनेकांना सदोष बिले जात असतील. त्यामुळे त्यांच्यावर अन्यायच होत असेल. किती वेळा आंदोलन करायची आणि का? त्यातून काही निष्पन्न होणार आहे की नाही. सातत्याने अशा चुका का केल्या जातात? की त्या जाणुनबुजून केल्या जातात, असे सवालही त्यांनी विचारले.वाढीव बिले आलेल्या वीजग्राहकांनी ठिकठिकाणी भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटावे, असे आवाहन कांबळे यांनी केले. जिल्ह्यातील भाजपाच्या नगरसेवकांनी नागरिकांना सहकार्य करावे, ‘महावितरण’च्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. ज्यांना न्याय मिळेल त्यांना मिळेल. भाजपा नागरिकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.