शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

हेल्मेट, सीटबेल्ट न वापरल्याने ७० टक्के मृत्यू; दंडाची रक्कम वाढवूनही उल्लंघन कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 7:55 PM

- अजित मांडके ठाणे : हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरणे आवश्यक आहे. त्याच नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. ठाणे शहरातही ...

- अजित मांडके

ठाणे : हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरणे आवश्यक आहे. त्याच नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. ठाणे शहरातही हे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत एक लाख ७३ हजार १०२ दुचाकीस्वारांवर हेल्मेट न वापरल्याने कारवाई झाली. मागील तीन महिन्यात २८ हजार २४९ एवढ्यांवर कारवाई झाली. सीटबेल्ट न वापरणाऱ्या ३५ हजार ८६ वाहन चालकांवर मागील वर्षभरात कारवाई करण्यात आली, तर मागील तीन महिन्यांत १६ हजार ६४२ जणांवर कारवाई झाली. एकूण अपघातांपैकी ७० टक्के अपघातांमधील मृत्यू हेल्मेट आणि सीटबेल्ट न वापरल्याने होतात, असे निदर्शनास आले आहे.

ठाणे शहरात भरधाव वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाण कमी नाही. वाहन चालविताना हेल्मेट किंवा सीट बेल्ट लावणे गरजेचे आहे. काही महिन्यांपासून हेल्मेट आणि सीटबेल्ट न लावणाऱ्यांकडून वसूल केली जाणारी दंडाची रक्कम वाढविण्यात आली. मात्र, त्यामुळे फरक पडला नाही. केवळ ठाणे शहरातील १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधी एक लाख ७३ हजार १०२ दुचाकी स्वारांवर हेल्मेट न घातल्याने कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ८ कोटी ६५ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत २८ हजार २४९ जणांवर कारवाई करीत एक कोटी ४१ लाख १४ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ३५ हजार ८६ चालकांनी सीटबेल्ट न लावण्याने त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ७१ लाख १ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. जानेवारी ते मार्च २०२२ या कालावधीत १६ हजार ६४२ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ३३ लाख २८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

एकूण अपघातांपैकी ७० टक्के अपघातात हेल्मेट न घातल्याने दुचाकीस्वारांवर मृत्यू ओढवतो. नव्या चारचाकी वाहनांमध्ये एअर बॅगचे प्रमाण वाढले आहे. परंतु सीटबेल्ट लावला नसेल आणि अपघात झाला तर त्यात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे दुचाकी चालविताना हेल्मेट घालणे गरजेचे असून, चारचाकी वाहनात बसल्यावर सीटबेल्टचा वापर करणे गरजेचे आहे.

- बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक पोलीस

हेल्मेट नसेल आणि अपघात झाला तर चालकाच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव होतो. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू होऊ शकतो, म्हणून दुचाकी चालविताना हेल्मेट गरजेचे आहे. तसेच सीटबेल्ट वापरला तर अपघात झाल्यास एअरबॅग खुल्या होऊन मोठी जीवितहानी टाळता येऊ शकते.

- डॉ. भीमराव जाधव, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठामपा

मी सुरुवातीला हेल्मेट वापरत नव्हतो. परंतु माझ्या डोळ्यासमोर एका दुचाकीस्वाराचा खड्ड्यांमुळे अपघात झाला. तो दुचाकीवरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. अपघातादरम्यान त्याने हेल्मेट घातले नव्हते. ही घटना पाहिल्यापासून मी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली.

- दुचाकी चालक

ठाणे शहर (जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२)

हेड - केसेस - दंड

विनाहेल्मेट प्रवास- १,७३,१०२ - ८,६५,४८,५००

जानेवारी ते मार्च २०२२

विनाहेल्मेट प्रवास - २८,२४९ - १,४१,१४,५००

ठाणे शहर (जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२)

हेड - केसेस - दंड

सीटबेल्टविना प्रवास - ३५,०८६ - ७१,०१,३००

जानेवारी ते मार्च २०२२

सीटबेल्टविना प्रवास - १६,६४२ - ३३,२८,२००

टॅग्स :Accidentअपघातthaneठाणे