शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

८० कोटींच्या भ्रष्टाचाराची होणार चौकशी

By admin | Published: August 20, 2015 12:52 AM

जिल्ह्यातील गावपाड्यांमधील ग्रामस्थांना हक्काची नळ पाणीपुरवठा योजना देण्यासाठी सुमारे ११० कोटी रुपये खर्चून जलस्वराज योजना राबवण्यात आली.

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील गावपाड्यांमधील ग्रामस्थांना हक्काची नळ पाणीपुरवठा योजना देण्यासाठी सुमारे ११० कोटी रुपये खर्चून जलस्वराज योजना राबवण्यात आली. मात्र जिल्हा परिषदेचे तत्कालीन अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने सुमारे ८० कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याने जिल्ह्यातील बहुतांशी योजनांची कामेच झाली नाहीत. तर काही योजना अर्धवटच राहिल्या आहेत. या संबंधी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात चर्चा झाल्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखील चौकशी समिती नियुक्त केली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्येही चर्चा झाली असता ठाणे जिल्हा परिषदेने स्वबळावर रकमा वसूल करून अर्धवट कामे पूर्ण करण्याचेही प्रयत्न केले. बहुतांशी प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल होऊन काही सरपंच व स्थानिक पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांनी अपहार रकमेचा भरणा केल्याचे सांगितले जात आहे. भ्रष्टाचाराची वाळवी लागल्यामुळे बहुतांशी गावांमध्ये अद्यापही पाणीपुरवठा झाला नाही. योजना राबवलेली असल्यामुळे पाणीटंचाई आराखड्यात या गावाचा समावेशही होत नाही. याशिवाय त्यांना पाणीपुरवठा करणारे टँकरनेही मंजूर होत नाहीत. या संबंधीची प्रकरणे न्यायप्रविष्ठ करणे हिताचे नाही. त्वरित उपाय म्हणून नामी युक्तीच्या आधारावर स्वप्रशासनाव्दारे अपहार रक्कम वसुली करण्याचे प्रयत्न ठाणे जि.प.ने केले. मात्र त्यातही फारसे यश हाती आलेले नाही. या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने विभागीय आयुक्ताची चौकशी समिती गठीत केली आहे. परंतु अद्यापही तिच्या कामकाजास गती मिळालेली नाही.ठाणे-पालघर या दोन्ही जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतींमध्ये नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. सुमारे २२९ विहिरींपैकी २१२ चे कामे करण्यात आले. त्यातील २०० विहिरी पूर्ण झाल्या. पण त्या कोरड्या आहेत. ११ विहिरींची कामे झाली नाही. २१६ जुन्या विहिरींच्या दुरूस्तींचे नियोजन होते. प्रत्यक्षात केवळ २०५ कामे हाती घेतली असता केवळ १९६ विहिरीं दुरुस्ती झाल्या. उर्वरित ९ विहिरींचे काम झालेले नाही. सुमारे २१६ हातपंपांपैकी केवळ २१३ हातपंप घेण्यात आले.