शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

ठाणे जिल्ह्यात ३५ ग्राम पंचायतींसाठी ८० टक्के मतदानाचा आंदाज, मंगळवारी मतमोजणी

By सुरेश लोखंडे | Published: December 18, 2022 7:28 PM

जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर आदी तालुक्यांतील ३५ ग्राम पंचायतींसाठी आज तब्बल ७५ ते ८० टक्के मतदान ५.३० वाजेपर्यंत झाल्याचा आंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.या मतदानाची मतमोजणी २० डिसेंबरला होणार आहे.

 जिल्ह्यातील या मतदानादरम्यान कल्याणच्या वासुंद्री ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये शाब्दीक बाचाबाची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील ४२ पैकी सात ग्राम पंचायतीं आधीच बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित ३५ ग्राम पंचायतींसाठी १३७ केंद्रांवर आज मतदान झाले. यासाठी ६५ हजार ५०७ मतदारांपैकी शेवटच्या क्षणापर्यंत ७५ ते ८० टक्के जणांनी मतदान केल्याचा आंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेवटच्या टप्यातील मतदानाची माहिती उपलब्ध होण्यास विलंब होणार असल्यामुळे दुपारनंतर केंद्रावरील मतदार संख्या लक्षात घेता संध्याकाळपर्यंत ७५ ते ८० टक्के मतदान झाल्याचा आंदाज तहसीलदार राजाराम तवटे यांनी व्यक्त केला.

 ग्राम पंचायतींच्या या मतदानासाठी सकाळपासून केंद्रांवर ग्रामस्थानी रांगेत उभे राहून मतदान केले. त्यामुळे जिल्हह्यात कोठेही अनुचित घटना घडली नसल्याचे सांगितले जात आहे. या मतदानाच्या कालावधीपैकी सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६५ हजार ५०७ मतदानापैकी १५.२० टक्के, तर सकाळी ११.३० वाजेपर्यंत ३७०३५ टक्के, दुपारी १.३० वाजेपर्यंत ५६.६४ टक्के आणि ३.३० वाजेपर्यंत ७१.२४ टक्के म्हणजे ४७ हजार ३७९ जणांनी मतदान केल्याचा अहवाल आहे.

यामध्ये २४ हजार ७३५ पुरूषांसह २२ हजार ६४३ महिला आणि इतर एक आदींनी मतदान केलेले आहे. या निवडणुकीसाठी ७२७ उमेवार निवडणूक रिंगणात होते. यापैकी ३५ सरपंच पदासाठी ११४ जणांसह २१९ सदस्य पदांसाठी ६१३ जणांसाठी आज तब्बल ८० टक्के मतदानाचा ५.३०वाजेपर्यंतचा आंदाज व्यक्त करण्यात आला. मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली नाही. यासाठी पोलिस अधिकारी, पोलिसांसह ९९० जणांचे मनुष्यबळ तैनात होते.

टॅग्स :thaneठाणे