शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ८२२ रुग्ण सापडले; ५२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:29 AM

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे गुरुवारी ८२२ रुग्ण आढळले असून ५२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १३ ...

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे गुरुवारी ८२२ रुग्ण आढळले असून ५२ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात पाच लाख १३ हजार ५४८ बाधितांची नोंद झाली असून मृतांची संख्या नऊ हजार ६१ झाली आहे.

ठाणे शहरात १५४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता एक लाख २८ हजार ४३७ झाली. शहरात सात मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या एक हजार ८७७ नोंदवण्यात आली. कल्याण - डोंबिवलीत १९९ रुग्णांची वाढ झाली असून २३ मृत्यू झाले आहेत. आता एक लाख ३२ हजार ४१९ रुग्ण बाधित असून एक हजार ९२१ मृत्यूंची नोंंद झाली आहे. उल्हासनगरला ५३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या २० हजार २५६ झाली असून ४६९ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधित असून मृत्यू नाही. आता बाधित १० हजार ४२४ असून मृतांची संख्या ४३६ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १३९ रुग्ण आढळले असून चार मृत्यू आहेत. या शहरात बाधितांची संख्या ४८ हजार ६१३ असून मृतांची संख्या एक हजार २६१ वर गेली आहे.

अंबरनाथमध्ये २० रुग्ण आढळल्याने आता बाधित १९ हजार २०४ असून दोन मृत्यू आहेत. येथील मृत्यूंची संख्या ४०५ झाली आहे. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या २० हजार ४७६ झाली आहे. या शहरात तीन मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या २५३ झाली आहे. ग्रामीणमध्ये ११५ रुग्णांची वाढ झाली असून सात मृत्यू आहेत. आता बाधित ३६ हजार ३३ झाले असून आतापर्यंत ८६० मृत्यू झाले आहेत.