शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
2
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
3
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
4
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
5
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
6
प्रसिद्ध अभिनेता झाला शेतकरी, घेतलं १.५ कोटींचं कर्ज; मुलाच्या शाळेबाहेर विकावी लागली भाजी
7
टेस्टमध्ये टी-२० तडका! रोहित-यशस्वी जोडीनं सेट केला 'फास्टर फिफ्टी'चा रेकॉर्ड
8
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
9
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
10
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
11
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
12
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
13
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
14
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
15
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
16
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
17
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
18
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
19
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
20
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही

उल्हासनगर हिराघाट बोटक्लबच्या विसर्जन घाटात ६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By सदानंद नाईक | Published: September 11, 2022 11:38 AM

उल्हासनगर महापालिकेने कॅम्प नं-३ हिराघाट बोटक्लब येथे विसर्जन घाट बनविला आहे

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका हिराघाट बोटक्लब विसर्जन घाटात शनिवारी ६ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री १० वाजता मुलाचा मृतदेह नातेवाईकांना मिळाला असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला. 

उल्हासनगर महापालिकेने कॅम्प नं-३ हिराघाट बोटक्लब येथे विसर्जन घाट बनविला आहे. शनिवारी बोटक्लब शेजारील भैय्यासाहेब आंबेडकरनगर मधील सहा वर्षाचा मुलगा राजवीर नितीन बेलेकर हा दुपारी ४ वाजता दिसेनासे झाल्यावर, आई-वडील व नावईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली. राजविरचा शोध घेत असतांना, काही जणांनी राजविर याला बोटक्लबकडे जातांना बघितल्याचे सांगितले. रात्री १० वाजण्याच्या सुमारास बोटक्लब विसर्जन घाटात त्याचा शोध घेतला असता, राजविरचा निचपत पडलेला देह मिळून आला. त्याला मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकारने मुलाच्या आई-वडीलासह नातेवाईकांनी महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. 

महापालिकेने हिराघाट बोटक्लब विसर्जन घाट ठिकाणी काही दिवस सुरक्षारक्षक तैनात करायला हवे होते. सुरक्षारक्षक तैनात असतातर, मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना झाली नसती. असा आरोप नागरिकांकडून होत आहे. तर दुसरीकडे आपले लहान मुले कुठे खेळतात. याकडे मुलांच्या पालकांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. बोटक्लब विसर्जन घाटातील पाणी मुर्तीची विरघळणे होत नाही. तो पर्यंत पाणी कमी करता येत नाही. पाणी काढल्यास विसर्जन केलेल्या मुर्त्या उघड्या पडण्याची शक्यता असते. मात्र काही दिवस सुरक्षेचा उपाय म्हणून सुरक्षारक्षक ठेवणे गरजेचे होते. असे मत काही नागरिक व्यक्त करीत आहेत. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस घटनेचा शोध घेत आहेत. तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सविस्तर माहिती घेऊन नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरGanpati Festivalगणेशोत्सव