शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

पर्यावरणावर विस्तव ठेवून केलेला विकास तात्कालिक ठरणार; १३०० वृक्ष पाडणाऱ्या बिल्डरला रोखणार?

By संदीप प्रधान | Updated: April 21, 2025 06:52 IST

बिल्डरांना झाडे तोडण्यापासून अनेक परवानग्या चुटकीसरशी मिळतात. बिल्डरने झाडे तोडण्यामुळे हळहळ व्यक्त करणारे, बिल्डरने नाल्यांचे मार्ग बदलल्याने चिडचिड व्यक्त करणारे, हे सारे अतिसूक्ष्म आवाज आहेत

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाण्यातील एका नामांकित विकासकाने १३०० वृक्ष तोडण्याकरिता वृक्ष प्राधिकरणाकडे अर्ज केला आहे. यामधील किमान शंभरेक वृक्ष हे जुनेपुराणे आहेत. मात्र बिल्डरने मोठ्या खुबीने त्यांचे वय कमी दाखवले. वन विभागाने ही मखलाशी उघड केली. कल्याणमध्ये रेल्वे यार्ड प्रकल्पाकरिता ४११ झाडे तोडण्याचा प्रस्ताव रेल्वेने दिला होता. तोडलेल्या १५० झाडांचे पुनर्रोपण केले. मात्र, पाणी न दिल्याने अनेक झाडे सुकली. काही दिवसांपूर्वी उत्तन येथील मेट्रो कारशेडकरिता अशीच १२०० झाडे तोडण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. मुंबई व ठाणे येथे सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. जी काही थोडीफार वनसंपदा शिल्लक आहे ती मेट्रो, रस्ते, पूल वगैरेंसाठी आणि बड्या बिल्डरांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी नष्ट केली जात आहे. विकास ही निश्चितच गरज आहे. परंतु पर्यावरणावर विस्तव ठेवून केलेला विकास तात्कालिक ठरणार आहे. 

ठाणे, डोंबिवली, कल्याण ही शहरे मुंबईसारखीच अहोरात्र सुरू असतात. अनेक नामांकित बिल्डर ठाण्यात इमारती उभ्या करत आहेत. शेकडो इमारतींचा समावेश असलेली शहरे आकाराला येत आहेत. याकरिता एकेकाळी जंगल असलेल्या भागातील वृक्ष सर्रास छाटले जात आहेत. घोडबंदर रोडवरून मीरारोडच्या दिशेने निघाल्यावर ठाण्यातील किती मोठ्या जंगलाची तोड करून टॉवर उभे केलेत, याची जाणीव होते. लोकांची घराची गरज वाढत आहे. मुंबईत नोकरीला जाणाऱ्यांसाठी ठाणे हे सोयीचे आहे. त्यामुळे ठाण्यात विकास सुरू आहे आणि वृक्षतोडही.

एक झाड तोडले तर त्या बदल्यात पाच झाडे लावायची, झाडाच्या वयोमानानुसार बिल्डरांनी पैसे भरायचे वगैरे नियम, अटी कागदावर असतात. वास्तव असे आहे की, बिल्डरांना लागणाऱ्या वेगवेगळ्या ३० ते ३५ ना-हरकती मिळवण्यासाठी जेव्हा फाईल वेगवेगळ्या टेबलवर फिरते तेव्हा काही वरिष्ठ अधिकारी हे प्रतिष्ठित गृहनिर्माण प्रकल्पात स्वत:साठी फ्लॅट पदरात पाडून घेतात. काही चौरस फुटांच्या दराने पैसे घेतात. स्थानिक लोकप्रतिनिधींची तर त्यांच्या मतदारसंघातील बड्या गृहनिर्माण प्रकल्पात पार्टनरशिप असते. त्यामुळे बिल्डरांना झाडे तोडण्यापासून अनेक परवानग्या चुटकीसरशी मिळतात. बिल्डरने झाडे तोडण्यामुळे हळहळ व्यक्त करणारे, बिल्डरने नाल्यांचे मार्ग बदलल्याने चिडचिड व्यक्त करणारे, हे सारे अतिसूक्ष्म आवाज आहेत.

बिल्डरांच्या वृक्षतोडीला मंजुरी मिळते; पण आदिवासी पाड्यांना वीज देण्यासाठी विजेचे खांब उभे करायचे किंवा पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाइपलाइन टाकायची तर हेच वनखाते वर्षानुवर्षे फाईलवर बसून राहते. घोडबंदर रोडवरील तहानलेल्या आदिवासी पाड्यांची व्यथा अलीकडेच ‘लोकमत’ने मांडली. ठाण्यातील १३०० झाडे तोडण्याची परवानगी मागणाऱ्या बिल्डरला गुपचूप परवानगी मिळेल. त्याची मखलाशी उघड करणारे वन विभागाचे तसेच महापालिकेचे अधिकारी तृप्तीचा ढेकर देतील.