शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

भिवंडीत मुंबई बडोदरा मार्गांमधील बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी श्रमजीवी संघटनेचे ठिय्या आंदोलन

By नितीन पंडित | Updated: January 11, 2024 17:33 IST

मुंबई बडोदरा महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधीत झाल्या आहेत

नितीन पंडित, भिवंडी :  मुंबई बडोदरा महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधीत झाल्या आहेत. या रस्त्यांसाठी जमीन भूसंपादन केलेल्या अनेक बाधित शेतकऱ्यांना आज ही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही तर तर काही शेतक-यांचे बायोमॅट्रीक होऊन संपादनाचा मोबदला दिला गेलेला नाही.या मुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश असून श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात शिरून ठिय्या आंदोलन सुरू केले.तेथे आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.या अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली होती.

यासंदर्भात उप विभागीय अधिकारी कार्यालयात प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल तीन तास चर्चा सुरू राहिली.या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर,संघटनेचे पदाधिकारी दशरथ भालके,संगीता भोमटे,जया पारधी,प्रमोद पवार,हिरामण गुळवी,सुनील लोणे,सागर देसक यांसह असंख्य कार्यकर्ते स्त्री पुरुष सहभागी झाले होते.

मुंबई बदोदरा रस्त्यात बाधित झालेले वडपे येथील आदिवासी शेतकरी कान्हु पदू डुकले,अर्जुन गंगाराम सापटे, इंदुबाई मारुती माळकरी,मौजे दुगाड येथील कृष्णा रावजी उंबरसाड़ा,संगिता मधुकर उंबरसाडा अशा अनेक शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नसून, अनेक शेतकऱ्यांना  बायोमॅट्रीक झाले असून ही संपादनाचा मोबदला दिला गेला नाही. या बाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून ही न्याय मिळत नसल्याने श्रमजीवी संघटनेने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता.

कार्यालया समोरील उड्डाणपूला खालील रस्त्यावर आंदोलन सुरू असतानाच अनेक कार्यकर्ते अचानक कार्यालय आवारात दाखल झाले व त्यानंतर त्यांनी अचानक घोषणाबाजी करीत कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजीस सुरवात केली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी सर्व आंदोलनकर्त्यांना कार्यालय परिसरात बसण्याची व्यवस्था केल्या नंतर शिष्टमंडळाने निवेदन देऊन चर्चा केली.

टॅग्स :bhiwandiभिवंडी