शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

ठाण्यातील तरुणाचे खंडणीकरिता थायलंडमध्ये अपहरण, परदेशात नोकरीचे दाखवले आमिष

By जितेंद्र कालेकर | Published: October 18, 2022 8:09 PM

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्याची केली जाते सक्ती

ठाणे: ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील आशिष दुबे या उच्चशिक्षित तरुणाचे थायलंडमध्ये तीन हजार डॉलरच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे. त्याची थायलंडच्या दूतावासाशी बोलून सुटका करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आशिषच्या पालकांनी केली. दरम्यान, ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल झाला असून ठाणे खंडणी विरोधी पथकाने दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

आशिषचा भाऊ अविनाश दुबे याने दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर ते ३ आॅक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये हा प्रकार घडला. आशिष हा २० सप्टेंबरला एका मित्राच्या ओळखीतून थायलंडमध्ये डिजिटल मार्केटिंग या फिल्डमध्ये नोकरीसाठी गेला होता. तिथे चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे त्याला सांगण्यात आले होते. आशिषने सर्व प्रक्रिया पूर्ण करून थायलंडमधील संबंधित कंपनीमध्ये नोकरी मिळवली. तिथे गेल्यानंतर मात्र त्याला वेगळाच प्रकार अनुभवायला मिळाला. त्याला जंगलातून नदी ओलांडून एका अज्ञात ठिकाणी नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्यासारख्याच भारतातील १३ तरुणांना ठेवण्यात आले होते.

सुरुवातीला क्रिप्टोकरन्सी क्षेत्रात ट्रेनिंग दिल्यानंतर बनावट ई-मेल आयडी तेही मुलींच्या नावाने तयार करुन अमेरिकन नागरिकांना क्रिप्टो करन्सी विकण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेऊन त्यांची फसवणूक करण्याचे काम आशिषला देण्यात आले होते. त्याच्यासह अन्य काही मुलांनी या कामाला नकार दिला. तेव्हा त्याला धमकावण्यात आले. आशिषसह अन्य काही तरुणांनी राजीनामा दिल्यानंतर ५० थायबाथ तिकीट खर्च आणि तीन हजार डॉलर अन्य शुल्काच्या नावाखाली साडेचार लाखांच्या खंडणीची मागणी या कंपनीचा मिसम हुसेन या एचआर प्रतिनिधीने केली. ती दिली तरच आशिषला सोडण्यात येईल, असे त्याने धमकावले.

दिवसातून एकदाच शिळे जेवण, १८ तासांचे काम असून चायनीज लोकांच्या सुरक्षिततेमध्ये त्यांना ठेवण्यात येते, अशा सर्व त्रासाची माहिती दुबे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री शिंदे तसेच पंतप्रधान मोदी यांना ईमेलद्वारे दिली. भारतीय आणि थायलंडच्या दूतावासाकडून दुबे कुटुंबीयांना प्रतिसाद मिळालेला नाही. या संपूर्ण रॅकेटमध्ये भारतातीलही काही लोकांचा समावेश असल्याचे आशिषने फोनद्वारे आपल्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आणल्याचे अविनाशने सांगितले.

त्याच्यासोबतच्या अन्य एका मुलाने पाच लाखांची रक्कम थायलंडच्या या टोळीला दिली. तरीही त्याला न सोडल्याने आशिष पूर्णपणे हादरला आहे. या संपूर्ण प्रकरणात राज्य आणि केंद्र सरकारने लक्ष देऊन आशिषसह त्याच्या साथीदारांची थायलंडच्या दूतावासाच्या मदतीने सुटका करावी, अशी मागणी दुबे कुटुंबीयांनी केली. दरम्यान, १२ आॅक्टोबर रोजी फसवणुकीसह खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून १७ आॅक्टोबर रोजी हे प्रकरण ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तपासासाठी आले असून दोघांची चौकशी केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी