शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आपत्तीग्रस्त कोकणवासीयांना आई सेवा प्रतिष्ठान-कोकण भूमी प्रतिष्ठानच्या मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 23:14 IST

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे :

ढगफुटी आणि महापुरामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जलप्रलय आला आणि अनेक गावे  उद्ध्वस्त झाली आहेत. हजारो संसार पाण्यात वाहून गेले असून त्यांच्या स्वप्नांचे चिखल झाले. अनेकांना प्राण गमवावे लागले. महापूरामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे लागणार्‍या या आपत्तीग्रस्तांसाठी राज्यातून मदतीचे हात पुढे आले. त्यात  ठाण्यातील आई प्रतिष्ठान तसेच कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण बिसनेस फोरम आणि रमाई  सेवा ट्रस्ट यांच्यामार्फत नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोकणवासियांना मदतीचा हात दिला. सुमारे दोन हजार कुटुंबांना प्रत्येकी महिनाभर पुरेल एवढे अन्नधान्य, कपडे, चटई, भांडी, पाणी, महिलांचे साहित्य, साबण, मेणबत्ती, माचिस, औषधे, ताडपत्री आदी जीवनाश्यक वस्तूंचे वितरण केले. त्याचबरोबर पुरग्रस्तांची तपासणी करीत त्यांच्यावर उपचारही केले.

आई सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार दिलीप शिंदे, अध्यक्ष संतोष शिंदे  आणि कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव, डॉ. दीपक दळवी यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. आतापर्यंत चार ट्रक भरून साहित्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ढगफुटीमुळे महाड शहर पुरात बुडाले. तर तळीये गावात दरड कोसळून 84 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले. तसेच खेडमधील पोसरेमध्ये भुस्खलन  होऊन 17 जण मृत्यू पावले. चिपळूण शहर बुडाला. महाड, खेड आणि चिपळूण तालुक्यातील अनेक गांवे हे पाण्याखाली गेली आणि सहा हजार कोटींचे  नुकसान झाले. त्या पुरग्रस्तांना पुन्हा उभे राहण्यासाठी राज्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. तरी ही ज्या गावांना मदत पोहचली नाही, अशा कातकरी, धनगर वस्ती व गावांमध्ये या संस्थांनी पोहचण्याचा प्रयत्न केला.  महाड आणि शेजारील वाड्या, वस्त्या, खेड तालुक्यातील चिंचघर, पोसरे, सापिर्ली, चोरवणे, सापर्ली देऊळवाडी, कातकर वाडी, साखर, कासई, धामनंद, कावळे, तळवट, पाली, खोपी, शिरगांव, धामनंद, चोरवणेमधील सुतारवाडी, उतेकरवाडी, डांगेवाडी, सार्पिली आणि पोसरे गावातील कातकरी वाडी, चिपळूण, दळवटणे, हिंगवलेवाडी, पेढे, बहादूरशेख नाका, कलबस्ते, शंकरवाडी, खेर्डी, सती, काना पिंपरी, खडपोली, गानेखडपोली येथील नदीपात्रातील धनगर व कातकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला. साहित्य वाटपासह धामनंद येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सदानंद जाधव, डॉ. भगवान गायकवाड, डॉ. दिगंबर वडजे, डॉ. संपदा जाधव, संजय काटकर यांनी सुमारे 95 ग्रामस्थांची तपासणी केली. शुगर तपासणीसह अन्य तपासण्या करीत त्यांना मोफत औषधे ही दिली.

या पुरग्रस्त भागामध्ये तीन दिवस राहून पत्रकार दिलीप शिंदे, संतोष शिंदे, रमाई ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शशी गमरे, अ‍ॅड. राणू गमरे, विश्‍वास शिंदे, विकास माहिमकर, सचिन झंझाड, संतोष शेलार, रोहन खाडे यांनी ग्रामस्थांना मदत पोहचवली. तसेच धामनंद ग्रामपंचायत सदस्य संभाजी उतेकर यांनी मदत केली.

टॅग्स :Ratnagiri Floodरत्नागिरी पूरRainपाऊसlandslidesभूस्खलन