शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

उल्हासनगर महापालिकेची मालमत्ता व पाणी कर थकबाकीधारकांसाठी अभय योजना, विलंब शुल्क होणार माफ

By सदानंद नाईक | Updated: July 16, 2024 18:58 IST

 उल्हासनगरात एकून १ लाख ८३ हजार १३८ करमूल्य मालमत्ता असून त्यांच्याकडे ९३६ कोटी ९९ लाख ९२ हजार ४९८ रुपयांची थकबाकी आहे.

उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी मालमत्ता व पाणीपट्टी कर धकबाकीधारकांना दिलासा देण्यासाठी २२ ते २६ जुलै दरम्यान अभय योजना जाहीर केली. अभय योजने अंतर्गत मालमत्ता व पाणीपट्टी करावरील १०० टक्के विलंब शुल्क माफ होणार असून नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

 उल्हासनगरात एकून १ लाख ८३ हजार १३८ करमूल्य मालमत्ता असून त्यांच्याकडे ९३६ कोटी ९९ लाख ९२ हजार ४९८ रुपयांची थकबाकी आहे. एकून ९३६ कोटीची थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने कंबर कसली असून गेल्या आठवड्यात थकबाकीदारक १४ मालमत्ताधारकांना नोटिसा देऊन जप्तीचा इशारा दिला होता. दरम्यान विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी थकबाकी मालमत्ताधारकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याची लेखी मागणी केली. अखेर आयुक्त अजीज शेख यांनी २२ ते २६ जुलै दरम्यान अभय योजना जाहीर केली. अभय योजनेमुळे मालमत्ता व पाणीपट्टीच्या एकून करावरील १०० टक्के विलंब शुल्क माफ होणार आहे. नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने आयुक्तांनी केले. 

महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गेल्या वर्षी दोन वेळा अभय योजना लागू केल्याने, विक्रमी १४० कोटींची मालमत्ता कर वसुली झाली होती. गेल्या वर्षीचा कित्ता गिरविण्यासाठी आयुक्तांनी अभय योजना लागू केल्याचे बोलले जात आहे. चालू वर्षी महापालिकेने १५० कोटींच्या वसुलीचे टार्गेट ठेवल्याची प्रतिक्रिया अप्रत्यक्ष अधिकारी देत आहेत. तर नागरिकांनी अभय योजनेचा फायदा घेऊन मालमत्ता कर बिल भरून शहर विकासाला हातभार लावण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले. अभय योजनेनंतर थकबाकी मालमत्ताची यादी बनवून कारवाईचे संकेत यावेळी आयुक्तांनी दिले. २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केल्याने, त्यामध्ये थकीत मालमत्ताधारक मालमत्ता कर भरून लाभ घेऊ शकतात. असे आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरTaxकर