शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

 "तलाव संवर्धनाच्या कामांनंतर तलावांचे शहर ही ठाण्याची ओळख अभिमानाने सागंता येईल"

By अजित मांडके | Published: January 12, 2024 7:02 PM

कार्यशाळेचे उद्घाटन करताना, बांगर यांनी महापालिकेच्या वतीने तलाव संवर्धनासाठी होते असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

ठाणे: ठाण्याची ओळख 'तलावांचे शहर' अशी अभिमानाने सांगता यावी, या दृष्टीने ठाण्यातील तलावांचे संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तलाव जपणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी अशाप्रकारच्या कार्यशाळांमधून आणखी चांगली दिशा मिळेल, असे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी 'तलावांचे शाश्वत संवर्धन' या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन करताना केले. ठाणे महापालिकेतर्फे आयआयटी, मुंबई, सीएसआयआर (CSIR), आसीसीएसए (ICCSA) आणि बेग (BEAG) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी माजिवडा येथील नागरी संशोधन केंद्र येथे तलाव आणि पाणवठे यांचे शाश्वत संवर्धन या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, सीएसआयआरचे संचालक राकेश कुमार, मुंबई महानगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाचे उपसंचालक श्रीकांत देशमुख, उपायुक्त (पर्यावरण) अनघा कदम, महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेचे उद्धाटन केले. 

या कार्यशाळेचे उद्घाटन करताना, बांगर यांनी महापालिकेच्या वतीने तलाव संवर्धनासाठी होते असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच, तलाव संवर्धनासाठी जास्तीचा निधी आवश्यक नसून संवर्धनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मेहनत करणाऱ्यांची गरज असल्याचे सांगितले. महापालिकेसोबत ग्रीनयात्रासारखी स्वयंसेवी संस्था एकत्र काम करीत असून सात तलावांच्या संवर्धनाची जबाबदारी ग्रीनयात्राने घेतली असल्याचे ते म्हणाले. तलाव संवर्धन हे सोपे काम नसले तरी ते अशक्य नाही. ठाण्यातील तलावांचे संवर्धन करून त्याचे अभिमानाने सांगता येईल असे ब्रॅडिंग करण्यात येईल, असेही श्री. बांगर म्हणाले. या कार्यशाळेमागील प्रेरणा ही सीएसआयआरचे संचालक राकेश कुमार यांची असून या कार्यशाळेचा सर्वच महापालिकांना उपयोग होईल, असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

सीएसआयआरचे संचालक राकेश कुमार यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. जगाच्या प्राधान्यक्रमात उर्जेपाठोपाठ पाणी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यादृष्टीने पाण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. ब्राझील आणि सौदी अरेबिया यांनी त्याबाबत आघाडी घेतली आहे. आपणही पाणी, सांडपाणी यांचे नियोजन याच्याकडे प्रकर्षाने लक्ष देण्याची गरज असल्याचे राकेश कुमार यांनी नमूद केले. पाण्याशी संलग्नता, पाण्याचे लेखापरिक्षण, पाणी व्यवस्थापक या तीन सूत्रांभोवती विचार होण्याची गरज आहे. तसेच, तलाव संवर्धनाच्या कामात भांडवली गुतंवणुकीपेक्षा तलावांचे व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा आहे, असेही राकेश कुमार यांनी स्पष्ट केले. 

या कार्यशाळेत, मुंबई महानगरपालिकेच्या शहर नियोजन विभागाचे उपसंचालक श्रीकांत देशमुख यांनी विकास आराखड्यातील कायदेशीर तरतुदींबद्दल विवेचन केले. तर, तलावांच्या शाश्वत संवर्धनासाठी उपयोगी ठरणारी नाविन्यपूर्ण साधने, नैसर्गिक भूरचना यांच्याविषयीचे सादरीकरण वास्तू रचनाकार आकाश हिंगोराणी आणि युसुफ आरसीवाला यांनी केले. सांडपाण्यावर प्रक्रिया, त्याचा पुर्नवापर, तंत्रज्ञानातील नवीन पर्याय, त्याचा प्रभावी वापर याबद्दल आयआयटी, मुंबईतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रदीप कलबार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. तुहीन बॅनर्जी यांनी तलाव संवर्धनाबाबतच्या तांत्रिक बाबींचा उहापोह केला. शेवटच्या सत्रात, डॉ. प्रियंका जमवाल, डॉ. हेमंत भेरवाणी, डॉ. अजय ओझा यांनी तलाव संवर्धनाबाबतेच विविध पर्याय मांडले. या कार्यशाळेचा समारोप हेमा रमाणी, नवीन वर्मा, राजेश पंडित यांच्या चर्चासत्राने झाला. त्याचे संचालन महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी केले. कार्यशाळेत, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार आणि पनवेल महानगरपालिकांचे प्रतिनिधी, ग्रीन यात्रा, एन्व्हारो व्हिजिल, ठाणे तलाव संवर्धन समिती आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका