शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

कळवा खाडीतील अनाधिकृत झोपड्यांवर दुसऱ्या दिवशीही कारवाई; रहिवाशांचा आंदोलनाचा प्रयत्न

By अजित मांडके | Updated: August 25, 2023 18:14 IST

कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे.

ठाणे: कळवा खाडीत उभ्या असलेल्या अनाधिकृत झोपड्यांवर सलग दुसऱ्या दिवशीही ठाणे महापालिकेने कारवाई केली आहे. गुरुवारी ६५ झोपड्यांवर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी देखील सांयकाळ पर्यंत ५५ ते ६० झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परंतु शुक्रवारी याठिकाणी राजकीय मंडळींनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यातही ही कारवाई टाळण्यासाठी येथील रहिवाशांनी आंदोलन देखील केले. मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरुच होती. त्यानंतर येथील रहिवाशांनी पुनर्वसन मागणी करीत पुलाखालीच आपला संसार थाटला आहे.

ठाणे महापालिकेच्या नौपाडा प्रभाग समितीच्या माध्यमातून सध्या ही कारवाई सुरु आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता सुरु झालेली कारवाई सांयकाळी थांबविण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा येथील अतिक्रमणांवर कारवाईचा बुल्डोजर फिरविला गेला. यावेळी रहिवाशांना आंदोलनाचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा हा प्रयत्न पालिकेने पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला. तर शुक्रवारी जवळ जवळ सर्वच पक्षाच्या मंडळींनी येथे हजेरी लावून कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यानंतरही ही कारवाई सुरुच होती. अखेर सांयकाळ पर्यंत पुन्हा ५५ ते ६० झोडपड्यांवर कारवाई करण्यात आली.

पुन्हा बांधकाम होऊ नये म्हणून खणला खड्डायापूर्वी देखील महापालिकेच्या माध्यमातून या भागात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा बांधकाम होतांना दिसून आले. परंतु शुक्रवारी कारवाई करतांना महापालिकेने थेट पोकलेनच खाली उतरला आणि बांबू काढतांना त्याठिकाणी खड्डा खणला. काही ठिकाणी अशाच पध्दतीने खड्डा खणल्याचे दिसून आले. त्यात खाडीचे पाणी जाऊन साचू लागले आहे. केवळ याठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये यासाठीच ही शक्कल लढविण्याचे दिसून आले.

पुलाखालीच थाटला संसारमहापालिकेने कारवाई केल्यानंतर येथील रहिवाशांना आपल्या मुलाबाळांसह येथील पुलाखालीच संसार थाटल्याचे दिसून आले. पुनर्वसनाची मागणी करीत हे रहिवासी आक्रमक झाले होते. त्यातही ज्या काही झोपड्यांवर कारवाई झाली, त्यातील काही झोपड्यांच्या ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा देखील बसविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

१४० रहिवाशांच्या पुर्नवसनासाठी आग्रहीखाडीत झोपड्या बांधल्या गेल्या असल्या तरी येथील १४० रहिवासी हे २०११ पासून याठिकाणी वास्तव्यास असल्याने मानवतेच्या दृष्टीकोणातून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी राजकीय मंडळींनी केली आहे. त्यानुसार त्यांचे तात्पुरत्या स्वरुपात रेंटलच्या घरात आणि नंतर हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याची तयारी देखील सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे