शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
4
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
6
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
7
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
8
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
9
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
10
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
11
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
12
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
13
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
14
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
15
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
16
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
17
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
18
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
19
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
20
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!

घराणेशाहीमुळे कार्यकर्ते दुखावले

By admin | Published: January 09, 2017 6:09 AM

शहरात दबंग नेत्यांच्या घराणेशाहीने कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. निवडणूक व विविध कार्यक्रमांत आपला वापर करून घेतला जातो,

सदानंद नाईक / उल्हासनगरशहरात दबंग नेत्यांच्या घराणेशाहीने कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. निवडणूक व विविध कार्यक्रमांत आपला वापर करून घेतला जातो, असा साक्षात्कार झाल्याने थेट जिल्हास्तरीय नेत्यांकडे तिकिटांची मागणी केली आहे. दबंग नेत्यांनी पुढच्या पिढीच्या सोयीसाठी राजकीय ताकद पणाला लावून एकाऐवजी दोन जागेची मागणी केल्याने नेतेही धर्मसंकटात सापडले आहेत. उल्हासनगरमधील राजकारणात घराणेशाही निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे निवडून आल्यानंतरही खऱ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याऐवजी पुढच्या पिढीची सोय दबंग नेत्यांनी चालवली आहे. या प्रकाराने निष्ठावंत कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट दिले नाहीतर बंडखोरी होण्याची शक्यता असून आम्ही फक्त झेंडा उचलून यांची कामे करायची का, असा प्रश्न विचारला जात आहे. कार्यकर्त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीने दबंग नेते संतापले असून निवडणुकीदरम्यान मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पप्पू कलानी व आमदार ज्योती कलानी यांनी ओमी यांना राजकारणाच्या पटलावर आणले. ओमी यांनी टीम निर्माण करून राष्ट्रवादीला आव्हान देत स्वत: इतर पक्षांसोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. माजी आमदार कुमार आयलानी यांनी मुलगा धीरज याला युवा नेता म्हणून पुढे केले. त्याचप्रमाणे माजी उपमहापौर विनोद ठाकूर यांनी धीरज ठाकूर यांना पुढे करून ते युवासेनेचे युवा अधिकारी आहेत. भाजपाचे माजी अध्यक्ष लाल पंजाबी यांनीही मुलाला उमेदवारी देण्यासाठी राजकीय ताकद पणाला लावली आहे. शिवसेनेतील दबंग नेते राजेंद्रसिंग भुल्लर यांनीही मुलाला राजकारणात आणले आहे.या नेत्यांनी लावली ताकद पणालामाजी महापौर लीलाबाई अशान, विजय पाटील, परशुराम पाटील, विनोद तलरेजा, मोहन गाडो, जया साधवानी, अंजली साळवे, सुरेश जाधव, दिलीप गायकवाड, नरेंद्र राजाणी, नाना बागुल, महादेव सोनावणे, जमनुदास पुरस्वानी, गोदू कृष्णानी यांनी पुढच्या पिढीला राजकारणात चंचूप्रवेश मिळण्यासाठी ताकद लावली आहे. पक्ष नेतृत्वाने वारंवार निवडून येणाऱ्या नगरसेवकांना घरी बसवून त्यांच्या जागी निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाची उमेदवारी द्यावी, या मागणीने जोर पकडला आहे.