शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

आरक्षणानुसार उमेदवार नसल्यास सरपंचाऐवजी प्रशासकीय राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 1:06 AM

सरपंचपदाचे आरक्षण : ‘पेसा’ गावात उमेदवाराची शक्यता कमी

ठाणे : जिल्ह्यातील तब्बल ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. त्यातून नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड जिल्ह्यात ८ व १० फेब्रुवारी या दोन दिवसांत होणार आहे. आरक्षणानुसार होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीसाठी संबंधित उमेदवार न मिळाल्यास सरपंचपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीवर सरकार प्रशासकाची निवड करून कामकाज पाहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.जिल्ह्यातील मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या एक हजार ४७२ सदस्यांसाठी या निवडणुका झाल्या आहेत. १५८ पैकी १४३ ग्रामपंचायतींच्या ९९४ सदस्यांसाठी मतदान झाले आहे. यासाठी दोन हजार ४१३ उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. आठ ग्रामपंचायतींच्या ४१८ सदस्यांची बिनविरोध निवड आधीच झाली होती. उर्वरित पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांवर  बहिष्कार टाकल्यामुळे तेथे निवडणुका झाल्या नाही. या गावांमध्ये पेचजिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी ४१८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले आहे. त्यापैकी आता १५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड आहे. निवडून आलेल्या एक हजार ४१२ सदस्यांपैकी ७८६ महिला आहेत; पण आरक्षणानुसार सरपंच असल्यामुळे बहुतांश ठिकाणी पेसा असलेल्या गावांमध्ये आरक्षणानुसार उमेदवार मिळण्याची शक्यता कमी आहे.पुढे काय करणार या ग्रामपंचायतींच्या निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंचपदाच्या आरक्षणास अनुसरून उमेदवार नसल्यास ग्रामपंचायत अस्तित्वात येणार नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीपर्यंत ग्रामपंचायतींवर प्रशासक राज अस्तित्वात राहणार असल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकीय वतुर्ळात ऐकायला मिळत आहे.बहुमत नसताना लॉटरी जिल्ह्यात सर्वाधिक ७८६ महिला निवडून आलेल्या आहेत, तर ६२५ पुरुष विजयी झाले आहेत. पण, सरपंचपदाच्या आरक्षणानुसार जास्त सदस्य संख्या असलेल्या विरोधी गटात उमेदवार नसल्यास प्रतिस्पर्धी गटातील मागासवर्गीय उमेदवाराला सरपंचपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. बहुतांश सदस्यांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.