शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्येत झाली वाढ; भिवंडी परिसरात प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 11:50 PM

सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने परिस्थिती चिघळली

- नितीन पंडितभिवंडी : शासकीय यंत्रणेच्या कठोर प्रयत्नांनंतर आटोक्यात आलेली भिवंडीतील कोरोना रुग्णसंख्या आता पुन्हा वाढण्याच्या मार्गावर आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.

भिवंडी शहर व ग्रामीण भागांत सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी महापालिकेत काही बदल करण्यात आले. त्यानुसार, आयएएस दर्जाचा आयुक्त नियुक्त करून, तज्ज्ञ व अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्याचबरोबर कोविड सेंटर उभारणी व अ‍ॅण्टीजेन चाचण्यांवर महापालिका प्रशासनाने भर देत शहरातील कोरोनाचे प्रमाण आटोक्यात आणले होते. ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत होती.

शहरात १५ ते २0, तर ग्रामीण भागात दररोज २0 ते २५ रुग्णांची नोंद होत होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये रुग्ण कमी व बेड जास्त अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. मात्र, गणेशोत्सव काळात भिवंडीतील रुग्णसंख्या कमालीची वाढली आहे. गणेशोत्सव काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न झाल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे बोलले जात आहे. गणेशोत्सव काळात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रविवारी शहरात एकाच दिवशी ४८ रुग्णांची वाढ झाली, तर ग्रामीण भागात तब्बल १00 रुग्ण वाढले आहेत.

भिवंडी शहर ग्रामीण भागात एकाच दिवसात १४८ रुग्ण सापडल्याने शासकीय यंत्रणेवर पुन्हा ताण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेपुढे पुन्हा एकदा रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान आहे. भिवंडी शहरात आतापर्यंत एकूण ४३४२ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३८७९ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरातील २९0 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात ४२७३ रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ३४३८ रुग्ण बरे झाले आहेत. ग्रामीण भागात आतापर्यंत १४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस