शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

रुग्णांच्या मृत्यूनंतर राजकीय संघटना आक्रमक, अधिष्ठातांसह अधीक्षकांना घेराव

By जितेंद्र कालेकर | Published: August 13, 2023 8:05 PM

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली.

ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अधीक्षक यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले असून अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर आणि अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट यांच्यावर निलंबनाची कारवाई करून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आव्हाड यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

रुग्णालयात एकाच रात्रीत मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाल्याची ही बाब उघडकीस आल्यावर रविवारी सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींसह मनसे आणि भाजप नेतेमंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. यामध्ये आव्हाड यांच्यासह भाजपा आमदार निरंजन डावखरे, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई, भाजप शहराध्यक्ष संजय वाघुले आदींचा समावेश हाेता. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयात डाॅ. बाराेट यांच्या केबिनमध्ये गोंधळ उडाला होता. या मृत्यूंसाठी महापालिका प्रशासन जबाबदार आहे. रुग्णालयात येण्यासाठी मोठे दरवाजे आहेत, पण बाहेर येण्यासाठी दरवाजा नाही, असा आरोपही आव्हाड यांनी केला. येथे पॅथॉलॉजी लॅब नाही. संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करून ती जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धरले धारेवरमाणसे मारायची सुपारी घेतली आहे का? रुग्णालय प्रशासनाने ठाणेकरांची माफी मागावी, असा हल्लाबोल मनसेच्या अविनाश जाधव यांनी केला. औषधांचा तुटवडा आहे. स्कॅनिंगही काही वेळा बंद असते. रुग्ण जास्त झाले, तर मग तसा फलक का नाही लावला? तसे पत्रच मुख्यमंत्र्यांना द्यायला हवे होते, असा पवित्रा केदार दिघे यांनी घेतला. २४ तास शवविच्छेदन सेवा सुरू राहावी, असा ठराव महासभेत झाला, त्याचे काय झाले? असा सवालही यावेळी भाजपच्या संजय वाघुले यांनी केला. नेत्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले.

खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधावा : डावखरेरुग्णांचे मृत्यू चिंताजनक आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांबरोबर समन्वय साधून रुग्णांवर उपचार करावेत, अशी सूचना आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिका प्रशासनाला केली. मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची विचारपूस करून डावखरे यांच्यासह राजकीय नेत्यांनी त्यांना धीर दिला. या रुग्णालयाला किती डाॅक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे, असा सवाल आव्हाड आणि डावखरे यांनी केला. काेराेना काळातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांना गरज पडल्यास पुन्हा घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

आयुक्तांवर जबाबदारी निश्चित करावी : घाडीगावकरशिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या कळवा रुग्णालयात महापालिका सर्वसामान्य नागरिकांना पुरेशा सोयी-सुविधा देत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कळवा रुग्णालयासाठी वारंवार दुरुस्ती आणि इतर सामग्रीसाठी पाच वर्षांत देयक काढले आहे, हे पाहता महापालिका आयुक्त यांच्यावर खरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटलJitendra Awhadजितेंद्र आव्हाड