शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

पुन्हा पाणी पेटले!

By admin | Published: January 08, 2016 2:06 AM

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गुरुवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक गाजली. तेव्हा कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी पालिकांसह २७ गावांच्या

ठाणे : अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गुरुवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक गाजली. तेव्हा कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी पालिकांसह २७ गावांच्या पाणीपुरवठ्याचे सुमारे पाच कोटी रुपयांचे बिल थकल्याचा गौप्यस्फोट एमआयडीसीने केला आणि ही बैठक वादळी ठरली. जिल्ह्यातील प्रमुख शहरांची लोकसंख्या वाढत असून तेथे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी जादा पाण्याची गरज असल्याचा आणि त्यासाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी मांडला. सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील आमदार आक्रमक झाले होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिकांकडे पाणीपट्टीची मोठी रक्कम थकीत असल्याचे एमआयडीसीने उघड केले. तरीही, एकाही गावाचा किंवा शहराचा पाणीपुरवठा तोडलेला नाही, हेही निदर्शनास आणले. सद्य:स्थितीत या महापालिकांना दररोज सुमारे ६५० एमएलडी सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचा दावाही एमआयडीसीने केला. महानगरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याच्या गरजेवरही या वेळी चर्चा झाली.कोणत्याही शहराचा किंवा गावाचा पाणीपुरवठा बंद नाही. तोडलेला नाही, असे उत्तर एमआयडीसीकडून मिळताच कल्याण-डोंबिवली परिसरातील लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा खोडून काढला. कल्याण पूर्वेतील कमी दाबाच्या पाण्याचा मुद्दा गणपत गायकवाड यांनी लक्षात आणून दिला.२७ गावांतील गावकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही लोकप्रतिनिधींनी केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही पाणी तोडले नसल्याचे उत्तर दिले. पाणी स्रोत वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कल्याण- शहराच्या पूर्व भागातील नेतिवली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी टंचाई असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरीक रस्त्यावर उतरले. त्यांनी कल्याण शीळ रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. नेतिवली परिसराचा पाणी पुरवठा एमआयडीसीने कल्याण डोंबिवली महापालिकेस सांगूनच बंद केला होता. त्यामुळे नेतिवली परिसराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेकडून एमआयडीसीकडे बिलाच्या पोटी पाच कोटी येणे आहे.एमआयडीसीचे कार्यकारी अभियंका सुरेश जगताप यांनी सांगितले की, या लाईनवरुन नेतिवली परिसराला एमआयडीसीकडून ०.३ दश लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात होता. हा पाणी पुरवठा महापालिकेस केला जात होता. महापालिकेकडून पाणी नागरीकांना पुरविले जात होते. त्यामुळे पाण्याचे नियोजन महापालिकेने करावे हे उघड आहे. या लाईनवर एमआयडीसीला पाणी ग्राहक नाही. त्यामुळे नेतिवलीचे पाणी पुरवठा करणारे कनेक्शन एमआयडीसीने बंद केले आहे. पाणी पुरवठा बंद करताना महापालिकेस सांगितले होते. शहापूरसाठी १६० कोटींचे माऊली धरणठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची पाणीटंचाई संपवण्यासाठी कर्जत तालुक्यात माऊली धरण बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १६० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. या धरणाचा सर्वाधिक म्हणजे ८० टक्के लाभ शहापूर तालुक्यातील गावांना होणार आहे. पुढील २५ वर्षांसाठी होणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन या धरणाचे काम हाती घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले. पण सत्ता कोणाचीही असू दे, या धरणाचे काम मीच करणार, असे फलक आमदार पांडुरंग बरोरा यांनी लावल्याचे खासदार कपिल पाटील यांनी निदर्शनास आणले. त्या धरणासाठी मी आधीपासून झटत असल्याचा दावा त्यांनी केला. आपण सर्व मिळून श्रेय घेऊ, असे सांगून बरोरा यांनी विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. या धरणाला मंजुरी मिळाली तर शाई धरणाला अडचण येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.