शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘हिंदुत्वाच्या विचारावर युती व्हावी’

By admin | Published: February 28, 2017 3:30 AM

मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना-भाजपाने काडीमोड घेत युती तोडली.

डोंबिवली : मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या वेळी शिवसेना-भाजपाने काडीमोड घेत युती तोडली. निवडणुका स्वबळावर लढवल्या. मात्र, आता हिंदुत्वाचा विचार करून दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी इच्छा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. तसे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. संघाच्या जनकल्याण समितीने गोळवलकर गुरुजी पुरस्कार सोहळ्याची माहिती देण्यासाठी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी त्यांनीही हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत ही इच्छा व्यक्त केली. शिवसेना व भाजपा यांनी एकत्र यावे की नाही, या प्रश्नावर महाराष्ट्र प्रांत जनकल्याण समितीचे अध्यक्ष रवींद्र साताळकर यांनी थेट उत्तर देणे टाळले असले तरी हिंदुत्ववादी पक्षांनी एकत्रित यावे, अशी इच्छा व्यक्त केली. आधीच मा.गो. वैद्य यांनी शिवसेना-भाजापाने एकत्र येण्याची भूमिका मांडण्यास आणि महापौरपद अडीचअडीच वर्षे वाटून घ्यावे, असे सुचवण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर साताळवकर यांच्या या वक्तव्याचा अर्थ हा शिवसेना-भाजपाने एकत्रित राहावे, असाच काढला गेला.महापालिकांमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी भाजपा-शिवसेनेत चढाओढ लागली होती. भाजपाला त्यात चांगले यश आले. त्याला केवळ ठाणे महापालिका अपवाद ठरली आहे. परंतु, दोन्ही पक्ष सत्तेच्या स्पर्धेत उतरले असले, तरी त्यांचा विचार हा सम आहे. हिंदुत्वाचा मुद्दा दोन्ही पक्षांकडे समानत्वाचा आहे. सत्ता ही जरी शिवसेना-भाजपामध्ये भेद निर्माण करणारी ठरली असली, तरी हिंदुत्व हे त्यांना पुन्हा एकत्रित आणू शकते, अशी संघ कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तीच या पत्रकार परिषदेत व्यक्त झाली. (प्रतिनिधी)