शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

कसारा, खोपोलीच्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:43 AM

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि खोपोलीपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीला जाण्यासाठी लोकल प्रवास करण्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि खोपोलीपर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरीला जाण्यासाठी लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाची चेन ब्रेक होईल हे माहीत नाही; पण कर्जत, खोपोली, कसारा या परिसरातून कल्याण मुंबईत लहान मोठ्या नोकऱ्या करून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो प्रवाशांचे कंबरडे मात्र साफ मोडून गेले आहे. कल्याण ते मुंबईदरम्यान रस्ते मार्ग प्रवास करता येतो. तसेच सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत. परंतु, कल्याण-कसारा व खोपोलीपर्यंतच्या नागरिकांना लोकलशिवाय दुसरा वाहतुकीचा सक्षम पर्याय नाही. अर्थचक्र सुरळीत ठेवण्याची भाषा करीत हजारो कुटुंबाची उपासमार करायची, हा कुठला न्याय आहे, असा सवाल संघटनेने केला आहे.

कल्याण-कसारा व खोपोली मार्गावरून कार्यालयीन वेळेत दुतर्फा एसटी बस सुविधा राज्य सरकार देऊच शकत नाही, हे मागच्या लॉकडाऊनमध्ये स्पष्ट झाले आहे. या लॉकडाऊनमध्ये या भागात आता उपासमारीचे बळी जाण्याची शक्यता आहे. तरी उर्वरित काळात कल्याणपुढील सर्व सरकारी व खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वैध ओळखपत्र वा अस्थापना

मालकाने दिलेले अधिकृत पत्र, यावर लोकलने प्रवास करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

-------------