शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
3
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
4
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
5
पराग शाह 500 कोटी तर मंगलप्रभात लोढा 441 कोटींचे धनी
6
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
7
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
8
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
9
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
10
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
11
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच
12
कोणताही आयपीओ घेणे शहाणपणाचे ठरेल का? लिस्टिंग गेनच्या लालसेने पैसे लावणे घातक
13
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
14
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
15
२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज
16
स्पर्धा परीक्षेत गडबड, तर 5 वर्षे कैद; 10 लाख दंड होणार
17
बंदूक साेड, घरी परत ये लाडक्या! दाेन अतिरेक्यांच्या पित्यांचे मतदानानंतर भावनिक आवाहन
18
वाराणसीच्या मंदिरांतील साईबाबांच्या मूर्ती हटवल्या
19
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
20
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव

अंबरनाथ झाले हागणदारीमुक्त

By admin | Published: July 08, 2017 5:34 AM

अंबरनाथमधील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. शहर हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पालिकेने दोन वर्षात

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. शहर हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पालिकेने दोन वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर शहर हागणदारी मुक्त करण्यात यश आले. केंद्र सरकारच्या पथकाने केलेल्या पाहणीनंतर शहर हागणदारीमुक्त झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अंबरनाथ शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक घरात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यात आले. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली. स्वच्छतागृहांची स्थिती सुधारल्याने उघड्यावर प्रातर्विधीला बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर पालिकेने भरारी पथक तयार करून उघड्यावर बसणाऱ्यांवर कारवाई केली. या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली. राज्य सरकारने या कामाचा गौरव करत अंबरनाथ शहराला पुरस्कारही दिला. तर केंद्र सरकारच्या पथकाने शहराची पाहणी करून उघड्यावर प्रातर्विधीला बसणाऱ्यांची माहिती घेतली. त्यात अंबरनाथमध्ये चांगले काम झाल्याचे समोर आले. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने दखल घेतली आहे. यापुढेही शहरात उघड्यावर कोणी प्रातर्विधीसाठी जाणार नाही त्याची दक्षता घेतली जाईल. - देविदास पवार, मुख्याधिकारी.