शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

अंबरनाथ पालिकेची मनसे आणि फेरीवाल्यांसह बैठक; फेरीवाला प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

By पंकज पाटील | Published: June 19, 2023 5:41 PM

अंबरनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागील ८ दिवसांपासून पालिकेकडून सातत्याने या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर पालिकेने आज मनसे आणि फेरीवाल्यांसह एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्यावर एकमत झाले. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर लवकरच फेरीवाला मुक्त होण्याची चिन्हं आहेत. 

अंबरनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागील ८ दिवसांपासून पालिकेकडून सातत्याने या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. मात्र कारवाई करताना फेरीवाल्यांना पर्यायी व्यवस्था किंवा फेरीवाला धोरण ठरवून देण्याची मागणी ही फेरीवाल्यांकडून केली जात होती. त्यामुळे पालिकेने आज मनसे आणि फेरीवाले यांच्यासोबत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, तर फेरीवाल्यांकडून ज्येष्ठ कामगार नेते श्यामदादा गायकवाड, फेरीवाला संघटनेचे नल्ला स्वामी उपस्थित होते.

मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या दालनात ही बैठक झाली. या बैठकीत फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काही निर्णय घेण्यावर एकमत  झाले. ज्यामध्ये स्टेशन परिसरातून फेरीवाल्यांचे स्थलांतर करणे प्रत्येक फेरीवाल्याला फक्त ३ पाट्या घेऊन बसण्याची परवानगी, रेल्वे ब्रिजवर फेरीवाल्यांना बसण्यास मनाई आणि स्टेशन परिसरापासून १५० मीटरचा पट्टा मारून त्यामध्ये फेरीवाले बसणार नाहीत,असे निर्णय घेण्यात आले. स्टेशन परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचे पूर्वेकडे य. मा. चव्हाण नाट्यगृह किंवा बॉम्बे हॉटेलच्या गल्लीत स्थलांतर करण्यात येणार असून पश्चिमेच्या फेरीवाल्यांचे एसटी डेपोच्या जागेत स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेकडून मनसे आणि फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळासह या सर्व जागांची आज पाहणी करण्यात आली. त्यानुसार भविष्यात नागरिकांना त्रास होऊ नये आणि सातत्याने पालिकेच्या होणाऱ्या कारवायांमुळे फेरीवाल्यांच्याही पोटावर पाय येऊ नये यासाठी स्थलांतराच्या भूमिकेला फेरीवाल्यांनी ही समर्थन दर्शवले. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा परिसर मनसेच्या दणक्याने लवकरच फेरीवालामुक्त होण्याची चिन्हं आहेत. 

टॅग्स :ambernathअंबरनाथ