शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

बदलापूरमध्ये राबवणार ‘अंबरनाथ पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:22 IST

प्रश्न पाणीवितरणाचा; आठवड्यातून दोनदा १५ तासांची केली जाणार कपात

अंबरनाथ: पाणीटंचाई लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ३० तासांची पाणीकपात लागू केली होती. ही कपात सरसकट केली जात असल्याने त्याचा परिणाम हा दोन ते तीन दिवस राहतो. सलग दोन ते तीन दिवस पाणी येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आता बदलापूरमध्येही प्राधिकरणाने अंबरनाथ पॅटर्न राबवण्याचे काम हाती घेतले आहे. सलग ३० तास पाणीकपात न घेता आठवड्यातून दोन वेळा १५-१५ तासांची कपात केली जाणार आहे. अंबरनाथमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे.बदलापूरमध्ये पाणीटंचाईमुळे टँकरलॉबी सक्रिय झाल्याने याप्रकरणी संताप व्यक्त होत होता. शहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरण पाणी पोहोचवू शकत नसल्याने या भागात टँकरशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातही टँकरमालक वाढीव दर आकारत असल्याने नागरिकांना दुहेरी त्रास सहन करावा लागतो. शहरातील पाणीसमस्या वाढत असल्याने प्राधिकरणाने नवीन प्रयोग हाती घेतला आहे. सलग ३० तास पाणी बंद ठेवल्याने दुसऱ्या आणि तिसºया दिवशीही पाणीवितरणात अडचणी येतात. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी प्राधिकरणाने शहराचे चार विभाग करून प्रत्येक विभागानुसार आठवड्यातून दोन वेळा १५ तासांची पाणीकपात घेतली जाणार आहे. पाणीसमस्येवर तोडगा काढत असताना १५ तासांची कपात घेतल्याने वितरणव्यवस्थेत सुधारणा करण्यास मदत होणार आहे. ३० तासांच्या कपातीमुळे सर्व जलवाहिन्या या कोरड्या पडत असल्याने वितरण सुरू झाल्यावर कोरड्या पडलेल्या वाहिन्या भरण्यातच वेळ वाया जातो. त्यामुळे जलवाहिन्या कोरड्या पडणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे सातत्याने प्राधिकरणाच्या कार्यालयावर नागरिकांचे मोर्चे निघत होते.अतिरिक्त पाण्यासाठी पाठपुरावा सुरूशहरासाठी जे ३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणी मंजूर झाले आहे, ते लवकरात लवकर नागरिकांना मिळावे, यासाठी पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता मनीषा पालंडे यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी या अतिरिक्त पाण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र हे वाढीव पाणी बारवी धरणावर अवलंबून असल्याने या धरणाचे काम पूर्ण झाल्यावरच बदलापूरला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. मात्र बारवी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेल्या नसून जून महिन्यापर्यंत त्यांचा प्रश्न सोडविण्यात यश आले तरच बदलापूरकरांची तहान भागणार आहे. हीच परिस्थिती अंबरनाथ शहराची असून बारवीच्या पाण्यावर २० दशलक्ष लिटर आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांचा विचार करता ५० दशलक्ष पाण्यासाठी प्राधिकरणाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी टॅँकरवर अवलंबून असलेल्या परिसरात प्राधिकरणाने लक्ष देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्यानुसार, प्राधिकरणाने लक्ष केंद्रित केले आहे. तसेच पालिका ज्या पद्धतीने प्रत्येक टँकरमागे ६०० आणि ८०० रुपये आकारत आहे, तशाच पद्धतीने प्राधिकरणाने खाजगी टँकरचालकांनाही दर निश्चित करून त्या दराने पाणी देण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यावरही प्राधिकरणाचे अधिकारी निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूरwater transportजलवाहतूक