शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
3
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
4
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
5
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
6
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
7
चंद्रशेखर यांच्या पक्षाला हरयाणात मोठा झटका; अनेक उमेदवारांना 500 पेक्षाही कमी मते...
8
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
9
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
10
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
11
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
12
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
13
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
14
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
15
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
16
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
17
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
18
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
19
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
20
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान

अंबरनाथ: शस्त्रनिर्मिती कारखान्यासाठी ब्रिटिशांनी उभारलेले स्टेशन, जाणून घ्या इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 9:22 AM

अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत.

पंकज पाटील

अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्याने या ठिकाणी देशभरातील कामगार रोजगारानिमित्त स्थिरावले आहेत. उद्योगांसाठी लागणारा सर्व कच्चा माल रेल्वेच्या मालगाडीतून अंबरनाथ स्थानकात येत असे. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानक हे औद्योगिक विकासाचा मार्ग ठरले होते. आता या रेल्वेस्थानकात मालवाहतूक होत नसली, तरी लोकल प्रवाशांची संख्या वाढली आहे.

मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाचा प्रारंभ झाल्यानंतर रेल्वेचा कल्याण आणि अंबरनाथच्या दिशेने विस्तार झाला. अंबरनाथ शहरात अनेक मोठमोठे कारखाने असल्याने त्यांना कच्चा माल आणण्यासाठी येथे मालवाहतुकीचे स्वतंत्र स्टेशनही उभारले गेले होते. इतर मालवाहतुकीचे स्थानक आता बंद अवस्थेत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात अंबरनाथमध्ये ब्रिटिशांनी शस्त्रनिर्मितीचे कारखाने सुरू केले होते. या कारखान्यात कच्चा माल आणण्यासाठी आणि तयार झालेली शस्त्रे नेण्यासाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग टाकले होते. त्यासाठीही स्वतंत्र स्थानक तयार केले होते. मात्र, आता ते स्थानकही बंद अवस्थेत आहे.

रोज दीड लाख प्रवासी- मालवाहतुकीसाठी तयार केलेले स्टेशन- रोज दीड लाख प्रवाशांचा प्रवास- वर्षभरापूर्वी अंबरनाथ रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मची निर्मिती- वाहन पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने रेल्वे स्थानकाच्या बाहेर अवैध पार्किंग- रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात असून, प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. - प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरच शौचालयाची सुविधा आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरही शौचालय गरजेचे आहे.- रेल्वे स्थानकात नवीन रेल्वे पादचारी पूल झाला असता तरी स्वयंचलित जिन्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. - ज्या ठिकाणी स्वयंचलित जिने बसविण्यात आले होते, तो पूल तोडण्यात आला आहे. 

टॅग्स :ambernathअंबरनाथ