शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

तौक्ते चक्रीवादळाची सर्वाधिक अडीच कोटींची मदत अंबरनाथ तालुक्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने १७ मे रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना फटका बसला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : निसर्ग चक्रीवादळापाठोपाठ तौक्ते चक्रीवादळाने १७ मे रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना फटका बसला आहे. या दरम्यान झालेल्या मनुष्यहानीसह शेती, फळबागा, जनावरे, घरांचे आणि मच्छिमार बांधवांच्या बोटींचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईपोटी ठाणे जिल्ह्याला या आधी १२ लाखांची व आता काही दिवसांपूर्वी वाढीव दराने राज्य शासनाने तब्बल सहा कोटी ६८ लाख ४८ हजार अशी सहा कोटी ८० लाख ४८ हजार रुपयांची भरपाई दिली. यात सर्वाधिक अंबरनाथ तालुक्याला दोन कोटी ५० लाख ६१ लाख रुपयांची भरपाई मिळाली आहे

तौक्ते चक्रीवादळाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या विविध स्वरूपाच्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीमधून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार नुकसानग्रस्तांना वाढीव दराने भरपाई लागू केली आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळामध्ये दिलेल्या दरानुसार ‘तौक्ते’ चक्रीवादळातील बाधित व्यक्तींना मदत देण्याचा निर्णय घेऊन ३ जून रोजी जारी निर्णयानुसार जिल्ह्यातील या नुकसानग्रस्तांना राज्य शासनाने भरपाई दिली आहे. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी जिल्ह्यातील प्रांत व तहसीलदारांना आदेश जारी करून या प्राप्त निधीचे वाटप करण्याचे आदेश जारी केले आहेत.

जिल्ह्यातील ठाणेसह मीरा-भाईंदर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर, भिवंडी या सर्व तालुक्यांना या तौक्ते चक्रीवादळाचा आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये मृत व्यक्ती, पिकांचे नुकसान, जनावरांचा मृत्यू, घरांचे पूर्ण व अंशतः झालेले नुकसान मच्छिमारांची जाळी, बोटी, मत्स्य बीज, दुकानदार टपरीधारक, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे जिल्हा ‌प्रशासनाने पंचनामे करून त्यास अनुसरून नुकसानग्रस्तांना, शेतकऱ्यांना, मृतांच्या वारसांना नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्यातील तहसीलदारांकडून वाटप करण्यात येत आहे.

------