शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

अंबरनाथचे जीआयपी धरण बनले मद्यपींचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 4:29 AM

धरणाची सुरक्षा रामभरोसे लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील रेल्वेचे जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनले असून, या ...

धरणाची सुरक्षा रामभरोसे

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबरनाथ : अंबरनाथमधील रेल्वेचे जीआयपी धरण सध्या मद्यपींचा अड्डा बनले असून, या धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे. या धरणाशेजारीच मोठ्या प्रमाणात मद्यपींचा वावर असून, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, कचरा यांचा खच पडलेला आहे.

अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी भागातील काकोळे गावाशेजारी रेल्वेने २०० वर्षांपूर्वी धरण बांधले होते. त्या वेळच्या ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेच्या नावाने म्हणजेच जीआयपी या नावाने हे धरण ओळखले जाऊ लागले. याच धरणातून कोळशाच्या इंजिनांना लागणारे पाणी वाहून नेले जात होते. मात्र, कोळशाचे इंजिन बंद झाल्यानंतर अनेक वर्षे हे धरण दुर्लक्षित होते. लालूप्रसाद यादव हे रेल्वेमंत्री झाल्यानंतर त्यांनी या धरणाशेजारी रेल नीरचा कारखाना उभारला आणि हे धरण पुन्हा उपयोगात आले. मात्र, हे धरण शहरापासून जवळ असल्यामुळे या धरणावर दररोज अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या भागांतून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात, तर मद्यपींचाही मुक्तसंचार धरणाच्या परिसरात असल्याचे उघड झाले आहे. अनेक जण धरणात आंघोळ करण्यासाठी तसेच गाड्या धुण्यासाठीही येतात. या धरणाच्या आजूबाजूला मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळतो, तर निर्माल्य आणि अन्य कचराही मोठ्या प्रमाणात धरणाच्या आजूबाजूला पडलेला असतो.

पावसाळ्यात हा सगळा कचरा धरणात वाहून येतो आणि अखेर हेच पाणी रेल्वेच्या प्रकल्पातून प्रवाशांपर्यंत पोहोचवले जाते. त्यामुळे या धरणाची सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. मात्र, असे असतानाही धरणावर रेल्वेकडून एकही सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. मद्यपी बिनधास्त धरणाच्या परिसरात उच्छाद घालत असतात. धरणाच्या आजूबाजूला तर अक्षरश: एखाद्या दारूच्या अड्ड्यासारखी परिस्थिती असते. त्यामुळे रेल्वेने वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत काकोळे गावचे उपसरपंच नरेश गायकर यांनीही रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, तरीही रेल्वेकडून या धरणाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची त्यांची तक्रार आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच रेल्वेला जाग येणार का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे.