शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

विराेधी पक्षाच्या नेत्यावरील हल्ला हे अराजकतेचे लक्षण; जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 6:06 AM

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही"

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विरोधी पक्षाच्या नेत्याच्या जीवाला धोका निर्माण केला जात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केली.

ठाण्याचे पोलिस कोणत्या मानसिकतेत आहेत, हे समजू शकते, मात्र मी त्यांना दोष देत नाही. परंतु अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे, असे आव्हाड म्हणाले.

उद्धवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर शनिवारी ठाण्यात मनसेच्या ३० ते ३५ जणांनी हल्ला केला. त्यावरून आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आव्हाड यांनी ठाकरे यांच्या मोटारीवर एकजण जवळून काहीतरी फेकत असल्याचा व्हिडीओ पाेस्ट केला आहे. त्यासाेबत त्यांनी, पोलिस अधिकाऱ्यांच्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांचे किती खच्चीकरण केले जात असेल, अशी टिप्पणीही केली आहे. आपला अधिकारीच इतका झुकतो तर आपण का ताठ राहावे, अशी पोलिस दलाची मानसिकता झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान मात्र खाली जातेय. ज्या पोलिस खात्याचे जगभर कौतुक केले जायचे; त्याच्यावर आता ही नामुष्की ओढवली आहे. जे घडले ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरेंना टोला

तुम्ही काहीही बोललात; कोणाचीही टिंगल-टवाळी केली तरी सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! पण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे