शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

विराेधी पक्षाच्या नेत्यावरील हल्ला हे अराजकतेचे लक्षण; जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 06:06 IST

"सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही"

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विरोधी पक्षाच्या नेत्याच्या जीवाला धोका निर्माण केला जात असेल तर महाराष्ट्रात किती अराजकता माजली आहे, हे लक्षात येते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी केली.

ठाण्याचे पोलिस कोणत्या मानसिकतेत आहेत, हे समजू शकते, मात्र मी त्यांना दोष देत नाही. परंतु अधिकाऱ्यांनी तरी कणा असल्यासारखे वागावे, असे आव्हाड म्हणाले.

उद्धवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर शनिवारी ठाण्यात मनसेच्या ३० ते ३५ जणांनी हल्ला केला. त्यावरून आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. आव्हाड यांनी ठाकरे यांच्या मोटारीवर एकजण जवळून काहीतरी फेकत असल्याचा व्हिडीओ पाेस्ट केला आहे. त्यासाेबत त्यांनी, पोलिस अधिकाऱ्यांच्या कणाहीन हालचाली पाहता पोलिसांचे किती खच्चीकरण केले जात असेल, अशी टिप्पणीही केली आहे. आपला अधिकारीच इतका झुकतो तर आपण का ताठ राहावे, अशी पोलिस दलाची मानसिकता झाली आहे. पण, अशाने महाराष्ट्राची मान मात्र खाली जातेय. ज्या पोलिस खात्याचे जगभर कौतुक केले जायचे; त्याच्यावर आता ही नामुष्की ओढवली आहे. जे घडले ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारे नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरेंना टोला

तुम्ही काहीही बोललात; कोणाचीही टिंगल-टवाळी केली तरी सगळ्यांनी ऐकून घ्यायचे; पण, तुम्हाला कोणी काय बोलले की, तुम्ही गाड्या फोडणार, सभा उधळून लावण्याची धमकी देणार, माझ्याशी गाठ आहे, अशी भाषा वापरणार! पण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्माला आलेले नाही, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे