शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अंगणवाडीसेविकांचा निवडणुकीच्या कामास गुरुवारपासून विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 05:39 IST

मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडीसेविका २५ एप्रिलपासून केवळ आहारवाटपाचे काम करणार आहेत.

ठाणे : मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडीसेविका २५ एप्रिलपासून केवळ आहारवाटपाचे काम करणार आहेत. उर्वरित निवडणुकीच्या कामांसह योजनांचे व इतर कोणतेही काम करणार नसल्याचा इशारा त्यांनी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसह प्रधान सचिव आणि एकात्मिक बालविकास आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.एकात्मिक बालविकास विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडीसेविका, मदतनीस आदी सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मार्चपासून अद्यापही मानधन मिळालेले नाही. त्या अर्धपोटी काम करत आहेत. गरीब, कष्टकरी कुटुंबातील या सेविका, मदतनीस आदी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर होत नाही. मार्च महिन्याचे मानधन अजूनही मिळालेले नाही. या मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे, यासाठी त्यांनी लाभार्थ्यांना आहारवाटपाव्यतिरिक्त करावे लागणारे काम गुरुवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीच्या कामांसह विविध योजनांची कामे, विविध सभांची भागीदारी, अन्य अहवाल आदी कामे अंगणवाडीसेविका, मदतनीस करणार नसल्याचे महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. याची पूर्वकल्पना मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्तांना दिलेली असूनही मार्चचे थकीत मानधन अजून दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.कामबंदचा फटका आहाराच्या लाभार्थ्यांना बसू नये म्हणून सेविका, मदतनीस त्यांचे दैनंदिन आहारवाटपाचे काम सुरू ठेवले आहेत. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधी व मतदानाच्या दिवशी मतदारांना चिठ्ठीवाटप करणे, मतदान केंद्रांवरील पाळणाघराचे काम, मतदान अधिकारी आदी लोकसभा निवडणुकीची कामेदेखील २९ एप्रिल रोजी कोकणातील सुमारे ६० हजार अंगणवाडीसेविका करणार नाहीत, असे बृजपालसिंह यांनी सांगितले.‘१ मे पूर्वी मानधन मिळावे’या निवडणुकीच्या कामाविरोधात न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यात आली आहे. मार्चचे थकीत व एप्रिलचे मानधन १ मे पूर्वी मिळावे, असा ठोस निर्णय घेतल्याशिवाय निवडणुकीसह कोणतेही कामे करणार नसल्याचे बृजपालसिंह यांनी निदर्शनात आणून दिले. यामुळे लोकसभेच्या मतदान केंद्रांवरील विविध कामांवर त्यांचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक