शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

सभागृह नेतेपदी अनिता गौरी

By admin | Published: May 06, 2015 1:43 AM

स्थायी समिती सभापतीपदी नरेश म्हस्के यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत अनेक मातब्बर असतांना पक्ष श्रेष्ठींनी ठाण्यात सभागृह नेतेपदी अ‍ॅड. अनिता गौरी यांची निवड केली आहे.

ठाणे : स्थायी समिती सभापतीपदी नरेश म्हस्के यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत अनेक मातब्बर असतांना पक्ष श्रेष्ठींनी ठाण्यात सभागृह नेतेपदी अ‍ॅड. अनिता गौरी यांची निवड केली आहे. मंगळवारी झालेल्या या निवडीने त्या ठाणे महापालिकेतील पहिल्या महीला सभागृहनेत्या ठरल्या आहेत. मुंबई महापालिकेत तृष्णा विश्वासराव यांची मागील वर्षी सभागृह नेतेपदी निवड झाली होती. तीच परंपरा ठाण्यातही शिवसेनेने कायम ठेवली आहे.गेल्या आठवड्यात रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शयर्तीत माजी महापौर अशोक वैती, नरेश मणेरा, विलास सामंत, दशरथ पालांडे, राम एगडे आदींसह, अनिता गौरी, मीनाक्षी शिंदे, अनिता बिर्जे आदी महिला सुध्दा शर्यतीमध्ये होत्या. अखेर या सर्वांना पिछाडीवर टाकत अनिता गौरी यांनी यात बाजी मारली असून त्यांची मंगळवारी सभागृह नेतेपदी निवड झाली. दरम्यान सुरवातीला अशोक वैती यांचे नाव अंतिम मानले जात होते. परंतु त्यांचे नाव डावलण्यात आल्याने अनिता बिर्जे यांच्यासह मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु अखेर गौरी यांची या पदावर निवड झाली आहे. त्या सलग दोन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी महापौरपदासाठीही चार ते पाच वेळा आग्रह धरला होता. परंतु त्यांना डावलण्यात आल्याने त्या नाराज होत्या. विशेष म्हणजे कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असतांना गौरी या शिवसेनेतून निवडून येत आहेत. एकूणच उपमहापौर पद कळव्याला दिल्यानंतर आता पुन्हा कळवा पट्यात शिवसेनेला वाढविण्यासाठी गौरी यांची निवड केल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे. (प्रतिनिधी)सर्व पदे वागळेलाच का...यापूर्वी सर्वच पदांचा मान हा वागळे इस्टेट आणि कोपरी भागातील शिवसेनेच्या मंडळींनाच मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट असो अथवा, महापौरपदाची लॉटरी आदींसह इतर महत्वाच्या पदांवर देखील वागळे पट्याचाच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे सर्व पदे वागळे इस्टेटलाच का असा काहीसा वादही गेले दिवस शिवसेनेत रंगला होता. त्यामुळेच कदाचित आता, वागळे पट्याला वगळून कळव्याला न्याय देण्याचा प्रयत्न पक्ष श्रेष्ठींनी केला असल्याचेही बोलले जात आहे. विरोधकांना शांत करणे अशक्यसध्या ठामपात महासभेचा कारभार अनागोंदी पध्दतीने सुरु आहे. कधी काय होईल हे सांगणे एकाही सदस्याला शक्य नाही. प्रत्येक महासभेत विरोधक जेव्हा आक्रमक झाले आहेत, तेव्हा त्यांना शांत करण्याची धमक नरेश म्हस्के यांनी दाखविली होती. तो समन्वय गौरी या कशा साधतात हे पहावे लागेल.