शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
2
"अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
3
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; बौद्ध प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
4
'हा' नेता ठाकरेंचं शिवबंधन तोडणार! अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार?
5
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
6
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
7
Jigra Movie Review: जिगरबाज बहिणीची डेअरिंगबाज कहाणी, आलिया भटचा 'जिगरा' कसा आहे वाचा
8
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; दिवाळीपूर्वीच सोन्याला पुन्हा झळाळी
9
खामेनेईंना सत्तेवरून हटवण्यासाठी इस्रायलकडून मोहीम, इराणला टारगेट करण्यास मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल
10
हिंद महासागरात चक्रव्यूह...! भारताची पकड आणखी मजबूत होणार; चीनला देणार टक्कर
11
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
12
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
13
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
14
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
15
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
16
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
17
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
18
पाकिस्तानचा दिग्गज वसीम अक्रमसोबत दिसली मिया खलिफा; चाहत्यांनी घेतली शाळा
19
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
20
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं

भातसा धरणाच्या विकासकामांसाठी २०० कोटींच्या निधीस मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 1:56 AM

पाण्याची गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला येणार यश  

- रवींद्र सोनावळेशेणवा : मुंबई व ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या मजबुतीकरणासाठी व धरणक्षेत्रातील अन्य आवश्यक असलेल्या विकासकामांसाठी राज्य सरकारने २०० कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती पूर्णपणे रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार असल्याचा दावा अभियंत्यांकडून केला जात आहे.सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने निविदा प्रक्रियेस मान्यता दिली आहे. यात भातसा धरणाच्या कामाचाही समावेश असून, धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा २ व ३ या प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.मंजुरी दिलेल्या या निधीपैकी पहिल्या टप्यात ११४ कोटींची कामे हाती घेतली जाणार असून, विशेष म्हणजे ही कामे अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणार आहेत. यामध्ये भातसा धरणाच्या ऊर्ध्व व अधो बाजूकडील (रँकिंग) सांधे भरणे या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. धरण मुख्य गेट, अंतर्गत लिफ्ट याची डागडुजी करणे व धरणावरील विद्युत प्रणालीची देखभाल व दुरुस्ती करणे, धरण माथ्यावर जाणारे पोहच रस्ते तयार करणे ही कामे या निधीतून केली जाणार आहेत, अशी माहिती भातसा धरणाचे सहायक अभियंता श्याम हंबीर व गणेश कचरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.