शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

अस्मानी संकट पालघरमधील शेतकऱ्यांची पाठ काही सोडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:48 PM

बळीराजा मेटाकुटीस: आधी दडी, मग अतिवृष्टी आणि आता ‘अवका‌ळी’

n  लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे अस्मानी संकट लागले आहे. पेरणीला पावसाने ओढ दिली, लावणीला पुन्हा दडी मारल्याने ती खोळंबली, सप्टेंबरनंतर अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके आडवी होऊन कुजू लागली, तर आता थोडे-फार हाती आलेले आणि खळ्यावर गोळा केलेले पीक मळणी करून धान्य घरात आणत असताना, पुन्हा अवकाळी पावसाने जिल्ह्यात सतत तीन दिवस हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात अस्मानी संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.पालघर जिल्ह्यात खरीपाचे १ लाख ५ हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक भातशेतीचे ७५ हजार, १५ नागली, वरईचे १० हजार, तर इतर पिकाचे ५ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यात मुख्य पीक भाताचे घेतले जाते. खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. थोडे-फार राहिलेले पीक आता भिजून वाया गेले. या काळात शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आणि नुकसान भरपाईची अंमलबजावणी शासनाने केली. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी खळ्यातील गंजीवर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकले, मात्र पिक भिजलेच. त्यामुळे यंदा खरीप हंगामात सुरुवातीपासून अखेरपर्यंत अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही.‘सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी’ डिसेंबरमध्ये थंडीचे दिवस असताना अवकाळी पावसामुळे हवामानातील गारवा व आर्द्रता अधिक वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. सध्याच्या या विचित्र अशा हवामानामुळे सर्दी, पडसे, खोकला, ताप येणे, थंडी वाजणे व त्यातून इतर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच जिल्ह्यात कोरोना फैलावत असून, नागरिकांनी त्या दृष्टीने या का‌ळात आपापल्या आरोग्याची योग्य खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सर्वांना केले आहे.