शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अंबरनाथ कल्याण ग्रामीण जोड रस्त्यावरील डांबर गेले वाहून

By पंकज पाटील | Updated: September 27, 2023 18:47 IST

टँकर आणि रेडिमिक्स काँक्रीटच्या गाड्यांमुळे रस्ता झालाय अपघातग्रस्त.

पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्याला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा नालंबी रोड सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. हा रस्ता डोंगरावरून जात असल्यामुळे तो रस्ता सुस्थितीत ठेवणे गरजेचे होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे या रस्त्यावरील सर्व डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांना अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंबरनाथ शहराला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून नालंबी रोड ओळखला जातो. या ग्रामीण भागात असलेल्या नालंबी भिसोळ आणि आपटी ही सर्व गावे अंबरनाथ शहराशी जोडली गेली आहेत.

दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थ देखील अंबरनाथ शहरात येत असतात. पूर्वीपासून हा रस्ता नेहमीच सुस्थितीत राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नेहमीच धोकादायक अवस्थेत राहिला आहे. 2021 मध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती केल्यानंतर वर्षभर देखील हा रस्ता टिकला नाही पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी खचला होता. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असल्याने त्या ठेकेदाराने पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी पॅचवर्क करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र ते काम देखील निकृष्ट झाल्यामुळे अवघ्या पाच ते सहा महिन्यातच अनेक ठिकाणी खड्डे पडले.

या रस्त्याची अवस्था बिकट असतानाच यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. अंबरनाथच्या कोहजगाव पासून नालंबीकडे जाणाऱ्या या डोंगराळ रस्त्यावर अनेक ठिकाणी अवघड वळणे असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र ते डांबरीकरण न केल्याने अवघड वळणावर मोठी वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला. अंबरनाथहुन टिटवाळाकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. या सोबतच हा रस्ता मुरबाडमार्गे नगरकडे जात असल्यामुळे अनेक वाहने या मार्गावरून जात असतात. उल्हास नदीमधून अनेक टँकर माफिया पाणी चोरून याच रस्त्यावरून अंबरनाथ शहरातील पुरवठा करीत आहेत त्यामुळे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या टँकरमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. कल्याण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रेडिमिक्सचे प्लांट उभारण्यात आल्याने त्या प्लांट मधून अंबरनाथकडे मोठ्या प्रमाणात रेडिमिक्सच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले.

टॅग्स :ambernathअंबरनाथPotholeखड्डे