शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

ग्रामस्थांनी अडवलेला रस्ता एमआयडीसीकडून सुरू करण्याचा प्रयत्न

By पंकज पाटील | Published: June 21, 2023 5:54 PM

अंबरनाथ तालुक्यातील पाईपलाईन रोडच्या भूसंपादनाचा वाद चिघळण्याची शक्यता

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात शेतकऱ्यांनी अडवलेला अर्धा राज्य महामार्ग पोलीस फौजफाटा घेऊन खुला करण्याचा प्रयत्न एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला. याला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला असून हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनीही धाव घेत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नसून फक्त पैसे हवे असल्याचा आरोप केला आहे.

 अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातल्या शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने सुमारे ५० वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी संपादित केली होती. मात्र हे भूसंपादन करताना केवळ एका कागदी चुकीमुळे रस्ता आणि पाईपलाईन ज्या जागेतून टाकण्यात आली आहे, त्याऐवजी बाजूची जागा एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता आणि पाईपलाईनची जागाही गेली आणि बाजूची जागाही एमआयडीसीच्या नावावर झाल्यामुळे तिथेही काही करता येत नाही, अशा पेचात इथले शेतकरी अडकले. ही कागदी चूक सुधारण्यासाठी मागील ५० वर्षांपासून लढा देऊनही एमआयडीसी हा प्रश्न सोडवण्यासाठी स्वारस्य दाखवत नसल्यानं अखेर वसार गावातील शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर पाईपलाईन महामार्गाची एक मार्गिका वसार गावाजवळ बंद केली. तसेच या रस्त्यावर शेतीसुद्धा करायला सुरुवात केली होती. यानंतरही एमआयडीसीकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतंही स्वारस दाखवण्यात आले नव्हते. मात्र बुधवारी सकाळी अचानक एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी येत हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत एमआयडीसी अधिकाऱ्यांना विरोध केला.

त्यामुळे हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनीही या ठिकाणी धाव घेत एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या या कृतीला विरोध केला. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केवळ एक कागदी चूक सुधारण्यासाठी मागील ५० वर्षात वेळ मिळालेला नसून त्यांना फक्त पैसे हवे आहेत, असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. या सगळ्यानंतर येत्या अधिवेशनातही आपण हा मुद्दा लावून धरणार असल्याचे गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे.