शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

अर्थसंकल्प फुगवण्यातच सत्ताधाऱ्यांना स्वारस्य? सत्ताधारी भाजपानं केली तब्बल ६०३ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 15:11 IST

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचा सन २०२० - २१ च्या अर्थसंकल्प १२६५ कोटी ८६ लाखां पर्यंतच आटोपला असताना सत्ताधारी भाजपाने मात्र सन २०२१ - २०२२ सालचा अर्थसंकल्प मात्र तब्बल २११२ कोटींचा मंजूर केला आहे . प्रशासनाने सादर केलेल्या १५०९ कोटींच्या अर्थसंकल्पात सत्ताधाऱ्यांनी तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे . सत्ताधाऱ्यांनी महसुली उत्पन्न पेक्षा अर्थसंकल्प अव्वाच्या सव्वा फुगवला असतानाच दुसरीकडे काँग्रेस व शिवसेनेने स्थायी समितीच्या आकडेवारीत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेचा २०२१ - २०२२ सालचा प्रशासकीय अर्थसंकल्प आयुक्त दिलीप ढोले यांनी स्थायी समितीला सादर केला होता . तो अर्थसंकल्प १५०९ कोटी १७ लाखांचा होता . परंतु स्थायी समिती मध्ये ह्या अर्थसंकल्पात मोठी वाढ करून अर्थसंकल्प तब्बल २०६२ कोटी ६५ लाखांवर नेऊन ठेवला . मंगळवारी झालेल्या महासभेत त्यामध्ये आणखी वाढ करून अर्थसंकल्प २ हजार ११२ कोटींचा करण्यात आला आहे . सत्ताधारी भाजपाने एकूणच प्रशासनाच्या अर्थसंकल्पात तब्बल ६०३ कोटींची वाढ केली आहे. 

स्थायी समितीचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेस नगरसेवकांनी मिळून सर्वानुमते मंजूर केल्याचे सांगितले जात असताना काँग्रेस व शिवसेनेने मात्र आकडेवारीत घोटाळा झाल्याची लेखी तक्रार आयुक्तांना केली आहे . काँग्रेसचे नगरसेवक अनिल सावंत आणि शिवसेनेच्या स्नेहा पांडे यांनी दिलेल्या पत्रात स्थायी समिती मध्ये जी आकडेवारी मंजूर झालेली होती त्यात परस्पर बदल करण्यात आला असून त्याची रेकॉर्डिंग तपासण्यात यावी . हि गंभीर बाब असल्याने कारवाईची मागणी सावंत व पांडे यांनी केली आहे . यामुळे स्थायी समितीने केलेला अर्थसंकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांनी , परिवहन सेवेत सध्या ५३ बस सुरु असताना परिवहन समिती साठी तब्बल २० कोटी देण्याची मंजुरी म्हणजे ठेकेदाराला पोसण्यासाठी जनतेच्या पैशांची लूट सत्ताधारी भाजपने चालवल्याचा आरोप केला आहे . विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील यांनी सुद्धा सत्ताधारी भाजपने अर्थसंकल्प फुगवून अनावश्यक कामे काढून टेंडर - टक्केवारी साठी जनतेच्या पैशांचा दुरुपयोग चालवल्याचा आरोप केला आहे. 

दुसरी कडे सभापती दिनेश जैन म्हणाले कि , आकडेवारी बाबत सावंत यांचा गैरसमज झाला होता तो दूर केला आहे. सत्ताधारी म्हणून शहराचा विकास आणि नागरिकांचे हित लक्षात घेऊनच अर्थसंकल्प केला आहे . विरोधक नाहक खोटे आरोप करत आहेत. मंगळवारी स्थायी समितीने २०६२ कोटींचा अर्थसंकल्प महापौर ज्योत्सना हसनाळे यांच्या कडे सादर केला होता . महासभेत २११२ कोटी पर्यंत वाढवून मंजूर करण्यात आला .  प्रशासनाच्या १५०९ कोटींचा अर्थसंकल्प सत्ताधारी भाजपाने २०११ कोटींवर नेऊन ठेवला आहे . गंभीर बाब म्हणजे सत्ताधाऱ्यांनीच सन २०२० - २०२१ चा सुधारित अर्थसंकल्प हा केवळ १२६५ कोटी ८६ लाखांचा असल्याचा मंजूर केला आहे . म्हणजेच चालू वर्षाचा अर्थसंकल्प जर १२६५ कोटींचा असताना तो सत्ताधाऱ्यांनी २११२ कोटींवर फुगवण्याचा हेतू काय ? असा प्रश्न केला जात आहे . 

सत्ताधाऱ्यांनी कुठे फुगवले उत्पन्न 

कोरोना संसर्गा मुळे अर्थसंकल्प कोलमडले असताना सत्ताधाऱ्यांनी सूर्य पाणी योजनेसाठी शासना कडून मिळणारे अनुदानाच्या अपेक्षित रकमेत तब्बल २९५ कोटींनी वाढ धरली आहे . या योजनेसाठी कर्ज घेण्याच्या रकमेत सुद्धा ५५ कोटींची वाढ केली आहे . मालमत्ता कराचे उत्पन्न तब्बल ४७ कोटींनी तर मालमत्ता हस्तांतरणचे उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे . मोकळ्या जागेच्या कराची वसुली होत नसताना त्यात सुद्धा त्याचे उत्पन्न ३० कोटींनी तर इमारत विकास आकार उत्पन्न ४० कोटींनी वाढवले आहे . मुद्रांक शुल्क अधिभाराच्या उत्पन्नात तब्बल १० कोटींनी तर जाहिरात फलक उत्पन्न ५ कोटींनी वाढवले आहे . मुदत ठेवींवरील व्याज ५ कोटींनी वाढवले आहे . 

कुठे वाढवला  खर्च

सत्ताधाऱ्यांनी नगरसेवक निधी , प्रभाग समिती निधी , स्वेच्छा निधी , आदरातिथ्य भत्ता आदीं खर्च करण्याच्या तरतुदी मध्ये प्रचंड वाढ करून घेतली आहे . बांधकाम विभागाच्या खर्चात १२४ कोटींनी तर  विकास आराखडा अमलबजावणीच्या नावाखाली बांधकाम आदी विभागासाठीच्या खर्चात २१ कोटींनी वाढ केली आहे .  पाणी पुरवठा विभागासाठीच्या खर्चात तर तब्बल ४०८ कोटीं रुपयांची वाढ केली आहे . विशेष म्हणजे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या खर्चात कपात केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेना