शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

कपातीतही बिल सरासरीएवढेच

By admin | Published: March 04, 2016 1:37 AM

लघुपाटबंधारे विभागाने आॅक्टोबर २०१५ पासून लागू केलेल्या कपातीनुसार शहराला आठवड्यातून ४ ते ५ दिवसच पाणीपुरवठा होतो

भार्इंदर : लघुपाटबंधारे विभागाने आॅक्टोबर २०१५ पासून लागू केलेल्या कपातीनुसार शहराला आठवड्यातून ४ ते ५ दिवसच पाणीपुरवठा होतो. कमी पाणी मिळत असतानाही प्रशासनाकडून पाणीबिल नेहमीप्रमाणे सरासरीएवढेच दिल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बिलातून कपातीचा कालावधी वगळून वसुली करावी, अशी मागणी केली जात आहे.पालिकेकडून दर चार महिन्यांनी बिले काढली जातात. ही बिले मीटर रीडिंगप्रमाणे वसूल केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी सुमारे २५ टक्कयांहून अधिक गृहसंकुलांना पाण्याचे मीटर बसविलेले नाहीत. त्यामुळे ज्या गृहसंकुलांना मीटर बसवले आहेत आणि ज्यांना मीटरजोडणी नाही, अशा सर्व ग्राहकांकडून पालिका सरासरी पाण्याचे बिल वसूल करते. मीटर असणारे ग्राहक जेवढे पाणी तेवढेच बिल भरणार असल्याचा दावा करीत आहे. त्याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करून सर्वांनाच सरासरी बिले पाठवत आहे. त्यातच, शहराला आॅक्टोबर २०१५ पासून ३० टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर काही ठिकाणी दर आठवड्याला ४ ते ५ दिवस तर काही ठिकाणी ३ ते ४ दिवसच पाणीपुरवठा होत आहे. शिवाय, पालिकेने पाणीपुरवठ्यासाठी काही विभागांचे झोन तयार केल्याने शेवटच्या झोनमध्ये असलेल्या नागरिकांना कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३० टक्कयांपेक्षाही अधिक पाणीकपात असताना नागरिक वाढीव पाणीबिल पालिकेला भरत आहेत. पाणीकपातीचा कालावधी बिलातून वगळण्याची मागणी सध्या करू लागले आहेत. अलीकडेच प्रशासनाने सर्व गृहसंकुलांना सरासरी बिले पाठवली असून त्यात नेहमीप्रमाणेच रक्कम दाखवल्यामुळे ती भरण्यास अनेकांनी नकार दिला आहे. ही बिले कमी करूनच निश्चित वसुली केली जावी, अशी मागणी भाजपाचे माजी नगरसेवक ओमप्रकाश गडोदिया यांनी आयुक्त अच्युत हांगे यांच्याकडे केली आहे. यावर गडोदिया यांनी सर्वांना पाण्याचे मीटर बसवून त्यातील रीडिंगनुसारच बिलाची वसुली करावी, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)