शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आव्हाडांनी मागितली ठाणेकरांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:29 IST

शिवसेनेच्या अपयशावर केली टीका; पाणीटंचाईवरही ओडले आसूड

ठाणे : ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्तेत असतानाही सत्ताधारी शिवसेनेला वाहतूककोंडी सोडवता आली नाही. त्याचा फटका मंगळवारी त्यांचेच नेते उद्धव ठाकरे यांना बसला. यामुळे ते यावर बोलतील, असे वाटले होते. पण, त्यांनी साधा ब्र सुद्धा उच्चारला नाही, त्यामुळे मी तमाम ठाणेकरांसह त्यांचीही सत्ताधाऱ्यांच्या वतीने जाहीर माफी मागतो, अशी उपरोधिक टीका राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केली.मंगळवारी ठाण्यात ठाकरे यांची सभा झाल्यानंतर बुधवारी आव्हाडांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. उद्धव यांना ठाण्यात येण्यासाठी तब्बल दोन तास उशीर झाला. कारण, त्यांना शीळफाटा येथील वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बाळासाहेबांचे पुत्र असतानाही त्यांनी याबाबत जराही चक्कार शब्द काढला नाही. त्यामुळे आता त्यांनाच कळून चुकले असेल की, आपली ठाणे महापालिकेत २५ वर्षे सत्ता असूनही आपण काय केले. ठाणे ते घोडबंदर या प्रवासासाठी एक ते दीड तास खर्च होतो, तर शीळफाटा ते ठाणे या प्रवासात दोन ते अडीच तास वाया जातात. परंतु, यावर उपाय करण्याऐवजी उद्धव यांनी आपले तोंड बंद ठेवण्याचे काम केले. त्यामुळे ठाणेकरांचे जे काही हाल होत आहेत, त्यासाठी मी त्यांच्यासह ठाणेकरांची जाहीर माफी मागतो, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.तसेच ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचेसुद्धा त्यांनी पुन्हा आश्वासन दिले आहे. परंतु, आता हा ठाणेकर आपल्या अशा आश्वासनांना भुलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सैनिकांच्या शौर्यावर आपण केव्हाही शंका उपस्थित केली नाही. उलट, उद्धव यांनीच चौकीदारावर संशय व्यक्त केल्याचे आव्हाड म्हणाले. ठाणेकरांना आज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.नको तिथे उधळपट्टीपाण्याचे नियोजन कोलमडून पडले आहे. परंतु, सत्ताधाऱ्यांनी साधे धरण ठाणेकरांना देऊ केले नाही. याउलट, नको त्या प्रकल्पांवर कोट्यवधींची उधळपट्टी केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv Senaशिवसेना