शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

अंबरनाथमध्ये भाजपाच्या बुथकडे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची पाठ

By पंकज पाटील | Updated: June 26, 2024 18:36 IST

लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केले. मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले नाही, असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे.

अंबरनाथ : कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला विश्वासात न घेतल्याचा थेट आरोप अंबरनाथमधील शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तर महायुतीत सर्व पक्ष एकदिलाने काम करत असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरात महायुतीत सारे काही आलबेल नसल्याचे पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केले. मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपने आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतले नाही, असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे. मनसेच्याही काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे अशाच भावना व्यक्त केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसेच आम्हाला विश्वासात घेतले नसले, तरी आम्ही मात्र महायुतीचा धर्म पाळत महायुतीला मतदान केले असल्याचंही शिवसेनेचे सुभाष साळुंके म्हणाले.

दुसरीकडे अंबरनाथ शहरातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या महायुतीच्या बुथवरही फक्त भाजपचेच कार्यकर्ते दिसत होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फक्त भेट देऊन गेल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे अंबरनाथ शहरात महायुतीत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, याबाबत भाजपाचे अंबरनाथमधील पदाधिकारी संजय आदक यांना विचारले असता, त्यांनी मात्र महायुतीत कोणतेही मतभेद नसून सगळे एकत्रपणे एकदिलाने काम करत असल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथElectionनिवडणूक 2024Votingमतदान