शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर समर कॅम्पमध्ये बालकलाकारांची धम्माल 'बालझुंबड'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 11:27 IST

अभिनय कट्ट्यावर 'शाळा बालकलाकारांची' या समर कॅम्पमध्ये बालकलाकारांनी बालझुंबड उडाली.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर बालकलाकारांची धम्माल 'बालझुंबड'ठाण्यातील बालवीरांसाठी समर कॅम्पबौद्धिक खेळ किल्ल्यांची माहिती सादर

ठाणे : शाळा संपली सुट्टी पडली करायचं काय जायचं कुठं अभ्यास करून कंटाळा आला आता सुट्टीत धम्माल करायची तर कुठे ठाण्यातील बालवीरांसाठी एक धम्माल समर कॅम्प अभिनय कट्टा आयोजित 'शाळा बालकलाकारांची'. या शाळेत नाटक होत नृत्य होत बौद्धिक खेळ किल्ल्यांची माहिती पण हे सर्व धम्माल मस्ती सोबतच.अभिनय कट्टा ४२६ वर ह्याच शाळेतील धम्माल विध्यार्थ्यांनी आपली कला सादर केली.

        मुलांमधील आत्मविश्वास वाढावा मराठी भाषेविषयी आवड वाढावी म्हणून जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित बालझुंबड कार्यक्रमात सर्व बालकलाकारांची आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील कविता पाठांतर करून चाल लावून सादर केल्या. *शिवम जंबुकर याने 'चंद्रावरची शाळा'; संघम मोरे ह्याने 'करवंदाची जाळी',समर्थ चौलकर ह्याने 'अंकाचा खेळ',अजिंक्य ताजने ह्याने 'सांग सांग भोलानाथ',इंद्रायणी बेलवलकर हिने 'ससोबा',वेदश्री निंबाळकर हिने  'कोणाला काय हवे',अनुप्रिता महाजन हिने 'फुलपाखरू', खुशी धावडे हिने 'पाऊस आला आला';आदित्य भोईर ह्याने 'संगणक' आणि स्वास्तिका बेलवलकर हिने 'भारतमाता* ह्या कवितांचे सादरीकरण केले.तन्मय मोरे ह्याने सादर केलेली चिंटूची इंग्रजी भाषेतील गोष्ट प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेली. कार्यक्रमाच विशेष आकर्षण होत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला 'नाकावरच्या रागाला औषध काय' हा नृत्यभिनय* .कळत नकळत चित्रपटातील रुसलेल्या भाचीला मनवण्यासाठी तिच्या मामाने केलेल्या धम्माल गीताचे नृत्य सादरीकरण शाळा बालकलाकारांची च्या सर्व बालकलाकारांनी सादर केले. सादर सादरीकरणात *सुदाम मोरे,संघम मोरे,तन्मय मोरे,तनिषा जाधव,शिवम जंबुकर,समर्थ चौलकर,इंद्रायणी बेलवलकर,स्वस्तिका बेलवलकर,अनुप्रिता महाजन,वेदश्री निंबाळकर,अजिंक्य ताजने,आदित्य भोईर* ह्यांनी सहभाग घेतला.बालकलाकरांच्या ह्या नृत्यभिनयाने उपस्थित प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.कट्टा क्रमांक ४२६ वरील बालझुंबड कार्यक्रमाचे निवेदन अभिनय कट्ट्याच्या बालकलाकार  चिन्मय मौर्ये ह्याने केले. अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी प्रत्येक बालकलाकारांची खास ओळख उपस्थितांना करून दिली.लहान मुलांमधील प्रत्येक कलागुण जोपासना गरजेचं आहे. कला माणसाला जगायला शिकवते.मोबाईलच्या युगात पुस्तकांचं वाचन कमी झालाय आपली वाचनसंस्कृती आपण जपणे गरजेचं आहे. म्हणूनच कवितावाचनाचा कार्यक्रम जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता' असे मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले* .

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक