शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING : अन् काही मिनिटांत चांदीचं झालं सोनं; भालाफेकपटू नवदीप भारताचा नवा 'गोल्डन बॉय'
2
सरकार मोठा शॉक द्यायच्या तयारीत; क्रेडीट, डेबिट कार्डने पेमेंट केल्यास १८ टक्के जीएसटी
3
Paris Paralympics 2024: दृष्टीहीन Simran Sharma ची कमाल; भिंगरीसारखी धावली अन् पटकावलं मेडल
4
'महायुतीने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढू'; राजभरांचा इशारा
5
उत्तर प्रदेशात तीन मजली इमारत कोसळली; २८ जणांना काढलं बाहेर, आजूबाजूचा परिसर केला रिकामा
6
तेलंगणात पुरामुळे २९ लोकांचा मृत्यू; ५,४३८ कोटी रुपयांचे नुकसान
7
छोटा पुढारीला बिग बॉसने दिला नारळ, घनःश्याम दरवडेचा सहा आठवड्याचा प्रवास संपला
8
पाकिस्तानचा लवकरच सौदी अरेबिया होणार; भर समुद्रात मोठे घबाड सापडले
9
महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
10
Puja Khedkar : पूजा खेडकरला आणखी दणका! केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
11
पाकिस्तानातील पुढची पिढी अडाणीच राहणार; करोडो मुले शाळेत जातच नाहीत
12
बीएमडब्लूची टेस्ट ड्राईव्ह घ्यायला गेला अन् दोघांना उडवलं; मुलुंड अपघात प्रकरणी आरोपीला अटक
13
उत्तर कोरियात किम जोंग उनची सत्ता उलथविण्याची तयारी? मोठी शक्ती लागली कामाला
14
"फितूरीचे संस्कार दाखवले"; बार्शीहून ३०० गाड्या आल्या, जरांगेंचा आमदार राऊतांवर हल्लाबोल
15
करोडपती बनणे एकदम सोपे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल; गणित समजून घ्या
16
कोलकात्यात रुग्णालयाचा नवा वाद; ३ तास रक्तस्त्राव, उपचाराअभावी मुलाचा मृत्यू
17
"भाजपाला शिवरायांचा इतिहास माहित नाही"; 'खंडणी' शब्दावरुन आरोप; जयंत पाटलांनी सुनावले
18
भाजपमध्ये तिसऱ्या दिवशीही राजीनामे थांबेनात; 72 नेत्यांचा पक्षाला रामराम
19
सेलेना गोमेज 32व्या वर्षीच बनली तरुण अब्जाधीश; 'या' कंपनीने केले मालामाल
20
'मराठा आरक्षणाबद्दल मविआकडून लिहून घ्या', राजेंद्र राऊतांचे आव्हान; जरांगेंनीही चॅलेंज स्विकारले

शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 5:59 AM

ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात १४४ (२) अंतर्गत आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. १५ ते १९ मे दरम्यान कुठेही फिरकू नका, असे सांगितले जात आहे. ज्या कार्यकर्त्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही, अशांनाही नोटीस बजावण्याचे कारण काय, असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केला. 

ठाणे पोलिसांनी या नोटीस मागे घेतल्या नाही तर आम्हालाही उलटी पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. २० मे रोजी ठाण्यात पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु, त्या आधीच शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटीस बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. ज्यांच्यावर हत्या, मोक्कासारखे आरोप आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आलेल्या नाहीत. मात्र, ज्या व्यक्तीवर एकही गुन्हा दाखल नाही, अशा व्यक्तींना नोटीस बजावणे चुकीचे असल्याचेही आव्हाड म्हणाले. त्यांचा गुन्हा एवढाच आहे की, निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात. त्यामुळेच त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आल्या. सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांना नोटीस बजावलेल्या नाहीत. विरोधकांना लक्ष्य करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाही, याकरिता प्रयत्न असून पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचेही आव्हाड म्हणाले.

ज्याला नोटीस बजावण्यात आली, त्याला मी माझ्या गाडीतून घेऊन फिरणार आहे, पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी, असा इशाराही त्यांनी दिला. निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले. गर्दीमुळे अगोदरच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शोमुळे सात तास मुंबईकरांना वेठीस धरण्यात आले. मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे तर मग रोड शो कशाला हवा, असा सवालही आव्हाड यांनी केला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४