शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण भरले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 4:52 PM

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्हासह औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो.

बदलापूर: संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धारण 100 टक्के भरले असून या धरणाचे आठ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.  या धरणातून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून धरणा खालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्याच्या मध्यावर असलेल्या बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्हासह औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची उंची वाढवल्यानंतर या धरणाच्या पाणी क्षमते दुपटीने वाढ झाली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान धरणातील 11 पैकी आठ स्वयंचलित दरवाजे उघडले गेले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. धरणामध्ये ७२.६० मीटर एवढी पाण्याची पातळी झाल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातात.

आज दुपारी बारा वाजताच्या दरम्यान धरणाने आपल्या क्षमतेची पातळी गाठली असून आता पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. बारवी धरण भरल्याने अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, ठाणे, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी यांचा पाणी प्रश्न कायमचा मार्गील निघाला आहे. सध्य स्थितीत धरणात 342 एमसीएम एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी हे धरण भरल्याने भविष्याची पाण्याची समस्या वर्षभरासाठी निकाली निघणार आहे.