शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

अंबरनाथच्या चिखलोली धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:48 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकाच साठा, पाणी जपून वारण्याचे आवाहन

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणीसाठा जलद गतीने कमी होत आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरवणे शक्य होईल, असे नियोजन केले जात आहे. मात्र, धरणातील पाणीसाठा लक्षात घेता हे पाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यायी पाण्याची व्यवस्था तसेच एमआयडीसीच्या मंजूर पाणीकोट्यातील पाणी हे अंबरनाथ पूर्व भागासाठी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.अंबरनाथ शहराला उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिखलोली धरणातील सहा दशलक्ष लीटर पाणी दररोज पूर्व भागात वितरित करण्यात येत आहे. मात्र, उन्हाचा कडाका वाढल्याने आणि पाण्याची पातळी जास्त खालवत चालल्याने या धरणातील पाणीसाठा जून महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, असे नियोजन केले जात आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून मिळणाºया पाण्यावर जास्त भर दिला जात आहे. चिखलोली धरणाची पातळी ही खालावत असल्याने या पाण्यावर जास्त दिवस अवलंबून राहणे शक्य होणार नाही. त्यातच, गेल्या वर्षीप्रमाणे पाण्यात रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्यास ऐन मे महिन्यात नागरिकांची पाण्यामुळे कोंडी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांसाठी एमआयडीसीचे पाणी घेतले जाते. त्यामुळे या पाण्याचे नियोजन जीवन प्राधिकरणाने आतापासूनच सुरू ठेवले आहे. पाण्यामध्ये रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्याने गेल्या वर्षी या धरणातील पाणी न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यंदा एमआयडीसी भागातील कंपन्यांचे रासायनिक द्रव्य जाणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. मात्र, तरीही धरणातील पाणी दूषित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. धरणाची पाण्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त खालावल्याने या पाण्याचेही नियोजन करूनच आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई