शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

दुर्गाडी खाडीपुलाच्या ऑनलाइन लोकार्पणाआधी रंगली श्रेयवादाची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:30 AM

कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. मात्र, त्या ...

कल्याण : कल्याण दुर्गाडी खाडीपुलाच्या दोन लेनचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी दुपारी झाले. मात्र, त्या आधीच पुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना, भाजप आणि मनसेत लढाई रंगली होती. त्यामुळे लोकार्पणस्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता.

कार्यक्रमस्थळी मनसेचे कार्यकर्ते सकाळी साडेदहा वाजता पोहोचले. त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना काय काम आहे अशी विचारणा करून पिटाळून लावले. पोलिसांना कुणकुण लागली की, मनसे त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार करू शकते. कार्यकर्त्यांना पोलिसांनी सांगितले की, या ठिकाणी फालतुगिरी करू नका, अन्यथा गुन्हे दाखल करावे लागतील, असा दम भरल्यावर ते त्या ठिकाणाहून निघून गेले. थोड्या वेळानंतर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर तेथे आले. त्यांनी आम्ही आंदोलन करणार नाही की, काळे झेंडे दाखविणार नाही. पुलाचे लोकार्पण होत असल्याने आनंद आहे. मात्र, या कामाकरिता मी स्वत: पाठपुरावा केला आहे. कामाची पाहणी करू द्या. त्यावेळी पोलिसांनी केवळ भोईरच पाहणी करतील, त्यांच्यासोबत कार्यकर्ते जाणार नाही, असे सांगितल्याने पोलिसांसोबत भोईर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेनेकडून त्यांना कार्यक्रमास बोलाविले गेले नसल्याचे सांगितले.

भोईर यांच्या या वक्तव्यावर शिवसेननेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, या पुलाच्या कामासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे याचा पाठपुरावा सुरू होता. त्यामुळे कोणी श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. माजी आमदारांना निमंत्रण दिले गेले नाही हा आमचा विषय नाही. हा कार्यक्रम एमएमआरडीएने आयोजित केला असल्याने त्यांनी त्यांना जाब विचारावा.

दरम्यान, एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आलेले भाजप खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की, माझ्या खासदारकीच्या निवडणुकीच्या सभेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांना या पुलाच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून त्यांनी या पुलाच्या कामाला मंजुरी दिली होती. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे पूल वेळेत पूर्ण झाला नाही. अन्यथा, या पुलाचे काम फडणवीस यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले असते. त्यामुळे श्रेय कोणीही घेऊ द्या हे काम भाजप सरकारच्या कारकिर्दीत झाले आहे.

------------------------