शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
5
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
6
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
7
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
8
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
9
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
10
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
11
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
12
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
13
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
14
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
15
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका
16
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
17
पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट! Mayank Yadav ची खास क्लबमध्ये एन्ट्री
18
"...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता", CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक
19
Suryakumar Yadav नं साधला मोठा डाव; किंग कोहलीनंतर असा पराक्रम करणारा दुसरा भारतीय
20
"आज इतकी वर्षे झाली, पण...", उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

पशू - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शहरात लागल्या सामूहिक पाणपोई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 9:59 PM

आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत.

मीरारोड - आता पासुनच उष्णतेच्या झळा आंगाची काहिली करु लागल्या आहेत. माणुस कुठुनही पिण्यााठी स्वच्छ पाण्याची सोय करु शकतो. पण मुक्या पशु - पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी काही श्वानप्रेमींनी पाणी साठवणीची सिमेंट भांडी श्रमदानाने शहरात लावली आहेत. या पशु - पक्ष्यांसाठीच्या सामुहिक पाणपोर्इंचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबवला जात आहे.शहरातील हॅण्ड फौंडेशन च्या वतीनेपहिल्यांदाच हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. या वेळी उन्हाळा तिव्र जाणवु लागलाय. पाण्याचे साठी झपाट्याने आटु लागले आहेत. शहरात देखील पाणी टंचाई सहन करावी लागत आहे. उष्म्या मुळे तहान वाढली आहे. माणुस पाणी पिण्याची सोय कशीही करु शकतो.परंतु भटके श्वान, मांजर, खारुताई, चिमणी, कावळा, साळूंकी, कबुतर आदी विविध पशु व पक्ष्यांना मात्र तहान भागवण्यासाठी शुध्द पाण्याची सोय तशी नसतेच. त्यातही वाढत्या गरमी मुळे त्यांची तहान देखील वाढते.मग अशा पशु - पक्ष्यांसाठी आपण स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय कशी करु शकतो यावर संस्थेचे अध्यक्ष फ्रांसिस लोबो , सचीव रविंद्र भोसले, खजिनदार नंदिनी पानिकर,संतोष मिश्रा, नामदेव काशिद, श्रृती सावंत, प्रमोद जैन आदींनी विचार विनीमय करण्यास सुरवात केली.त्यातुन आपण शहरात आवश्यक अशी ठिकाणं निवडुन तेथे पिण्याच्या पाण्याची सोय करु शकतो असं ठरलं. सरीता रातुरी यांनी पाणी ठेवण्यााठी सिमेंटची घमेल्याच्या आकाराची भांडी देण्याची जबाबदारी घेतली.पण भांडी लावल्या नंतर त्या मध्ये नियमीत पणे स्वच्छ पाणी टाकण्याच काम कसं करायचा असा प्रश्न पडला. पण तो प्रश्न देखील शहरातील पशुप्रेमींनी सोडवलाय.शहरात अनेक भागात पशु व श्वान प्रेमी नागरीक राहतात. ते नित्यनेमाने या भटक्या श्वान आदिंना दूध, पाणी, अन्न देत असतात. त्यांची देखभाल व औषधोपचार सुध्दा करत असतात. त्यामुळे पाण्याच्या भांड्यां मध्ये नियमीत पाणी ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या कडे सोपवण्याची विचारणा केली गेली. आणि त्या पशुप्रेमींनी लागलीच ती जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली.यंदाचा कडक उन्हाळा पाहता पहिल्यांदाच या सामुहिक पशु-पक्षी पाणपोईची संकल्पना राबवण्याचा विचार केला. शहरात आता पर्यंत २५ ठिकाणी आम्ही पाणी साठवणारी सिमेंटची भांडी लावलेली आहेत. नागरीकांनी देखील सहकार्य केले तर नियमीतपणे या भांड्यां मध्ये पाणी भरुन राहिल. जेणे करुन परिसरातील भटके श्वान, मांजर, गुरं - ढोरं सह अन्य पशु व पक्ष्यांची तहान आपण भागवु शकतो असं संस्थेचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरnewsबातम्या