शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाईंदरमध्ये मालमत्ताकराची केवळ ४६ टक्केच वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:29 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात मालमत्ताकरापोटी २०३ कोटींचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, १० महिन्यांत या उद्दिष्टांपैकी ४६ टक्केच वसुली झाल्याने पालिकेचा आर्थिक गाडा दिवाळखोरीच्या गर्तेत सापडण्याची चिन्हे आहेत.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१८-१९ च्या अंदाजपत्रकात मालमत्ताकरापोटी २०३ कोटींचे उद्दिष्ट ठेवले. मात्र, १० महिन्यांत या उद्दिष्टांपैकी ४६ टक्केच वसुली झाल्याने पालिकेचा आर्थिक गाडा दिवाळखोरीच्या गर्तेत सापडण्याची चिन्हे आहेत. उर्वरित ५४ टक्के करवसुलीसाठी पालिकेकडे केवळ दोन महिन्यांचाच अवधी शिल्लक असला, तरी त्यासाठी पुरेसे मनुष्यबळही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.शहरातील अनेक नवीन बांधकामे अद्याप मालमत्ताकराच्या कक्षेत आणलेली नाहीत. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. परिणामी, रोज वसूल होणाऱ्या कराची आकडेवारी लेखा विभागाला सादर करून निधी तरतुदीची कामे पार पाडावी लागत आहेत. कंत्राटदारांना कामांची बिले वेळेवर दिली जात नसल्याने कंत्राटदार कामे करण्यास अनुत्सुक आहेत.पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने राखीव निधी वापराचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्याला वेळीच ब्रेक लावण्यात आला. यंदाच्या आर्थिक वर्षात प्रशासनाने कर विभागाला मालमत्ताकरापोटी २०३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले. पण, त्याची वेळेत वसुली न झाल्याने पालिकेच्या आर्थिक ताळेबंदीवर संकटाचे वलय निर्माण होण्याची शक्यता आहे.शहरात सुमारे तीन लाख ४१ हजार मालमत्ता आहेत. ज्या मालमत्ता बेकायदा आहेत, त्या मालमत्तांपोटी पालिका दंडात्मक कराची वसुली करते. परंतु, राज्य सरकारने गेल्यावर्षी काढलेल्या आदेशानुसार ६०० चौरस फुटांपर्यंतच्या बेकायदा निवासी सदनिकांवरील १०० टक्के दंड पालिकेकडून माफ केला जात आहे. तर, ६०० ते १००० चौरस फुटांपर्यंतच्या बेकायदा निवासी सदनिकांकडून १०० ऐवजी ५० टक्केच दंडवसुलीला मान्यता देण्यात आल्याने पालिकेला १००० चौरस फुटांपर्यंतच्या बेकायदा बांधकामांपोटी मिळणारे ७५ टक्के पालिकेने चालू वर्षात कर विभागाला २०३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट दिले असले, तरी १० महिन्यांत ९५ कोटींचीच वसुली झाली आहे. त्यामुळे पालिकेला उर्वरित ५४ टक्के म्हणजेच १०८ कोटींच्या वसुलीसाठी दोन महिन्यांत युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.कर विभागाचे एकूण ३७ पैकी १९ लिपिक व दोन शिपाई लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आले आहेत. तर, एकूण ८८ झोनपैकी तीन झोनमध्ये लिपिकच नाही.मालमत्ताकराच्या थकीत वसुलीसाठी कर विभागात पुरेसे मनुष्यबळ नसले, तरी इतर विभागांतील कर्मचाºयांची करवसुलीसाठी तात्पुरती नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी विविध पथके तयार करून करवसुलीसाठी प्रसंगी पाणीपुरवठा खंडित करणे तसेच इमारतीमधील कचरा न उचलणे आदी गंभीर पावले उचलावी लागणार आहेत.- दादासाहेब खेत्रे, करनिर्धारक व संकलक

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर