शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

उल्हासनगरात मनसेकडून भालेराव रिंगणात

By सदानंद नाईक | Updated: October 27, 2024 17:39 IST

राज ठाकरे यांनी भालेराव यांची उल्हासनगरसाठी उमेदवारी घोषित केली.

सदानंद नाईक, उल्हासनगर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भगवान भालेराव यांची उल्हासनगर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली. गेल्या वेळी भालेराव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढून तिसऱ्या क्रमांकाचे मते घेतली होती.

 उल्हासनगर रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राहिलेले भगवान भालेराव यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली होती. मात्र शेवटच्या क्षणी ओमी कलानी यांची शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यावर, भालेराव यांचा भ्रमनिरास झाला. त्यांनी मनसेच्या स्थानिक पदाधिकार्यासह राज ठाकरे यांची रविवारी भेट घेऊन समर्थकासह मनसेत प्रवेश केला. ठाकरे यांनी भालेराव यांची उल्हासनगरसाठी उमेदवारी घोषित केली.

 भालेराव महापालिकेचे उपमहापौर राहिले असून आंबेडकरी जनतेत त्यांचे वजन आहे. २०१९ साली त्यांनी अपक्ष म्हणून उल्हासनगर मतदारसंघातून निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाचे ८ हजार पेक्षा जास्त मते मिळविली होती. भालेराव यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी पराभूत झाल्याचे बोलले जाते. मनसेने भालेराव यांची उमेदवारी घोषित केल्याने, उल्हासनगर मतदारसंघात कलानी, आयलानी व भालेराव अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहर विकास कागदावर असल्याने, नागरिकांना आयलानी-कलानी ऐवजी तिसरा पर्याय हवा आहे. त्यामुळे नागरिक माझा विचार निश्चित करतील. असा विश्वास भालेराव यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर