शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील मुख्य रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात

By धीरज परब | Published: November 30, 2022 7:16 PM

फेरीवाला पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी  

मीरारोड - भाईंदर रेल्वे स्थानक परिसर व भाईंदर मधील मुख्य वर्दळीचे रस्ते हे फेरीवाले - हातगाडी वाल्यांच्या विळख्यात असून नागरिकांना चालण्यास पदपथ व रस्ते मोकळे राहिलेले नाहीत . यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे . त्यामुळे फेरीवाला पथक प्रमुखासह संबंधित प्रभाग अधिकाऱ्यां वर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी होत आहे.  

भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पूर्व व पश्चिमेला फेरीवाले आणि हातगाडी वाल्यांचा विळखा पडला आहे . त्यामुळे नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरातून बाहेर पडणे अडचणीचे झाले आहे . फेरीवाल्यां मुळे गर्दी होते . स्टेशन परिसर असल्याने सार्वजनिक बस , रिक्षा , दुचाकी व अन्य वाहनांची मोठी वर्दळ असते . फेरीवाल्यां मुळे परिसर मोकळा नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे . रेल्वे स्थानक पासून १५० मीटर परिसरात फेरीवाले - हातगाड्या ना मनाई असताना देखील दिवस रात्र फेरीवाले अतिक्रमण करून असतात. 

तीच गत भाईंदर मधील मुख्य रस्त्यांची झाली आहे . भाईंदर पूर्वेचे स्टेशन मार्ग , बाळाराम पाटील मार्ग , तलाव मार्ग , नवघर मार्ग , इंद्रलोक नाका व मुख्य रस्ता , जेसल पार्क - राहुल पार्क रस्ता व नवघर फाटक मार्ग असे मोजून ६ - ७ रस्ते आहेत . मात्र हे रस्ते , पदपथ व नाके फेरीवाल्यांच्या घश्यात घालण्यात आले आहेत . 

भाईंदर पश्चिमेला तर छत्रपती शिवाजी महाराज मार्ग व डॉ . बाबासाहेब आंबेडकर ६० फूट मार्ग , मॅक्सस परिसर असे मोजून तीन - चार रस्ते त्यावर सुद्धा फेरीवाले - हातगाडीवाल्यानी उच्छाद मांडला आहे . त्यांना बेकायदा वीज पुरवठा होत आहे. भाईंदर मधील पदपथ व रस्ते फेरीवाल्यांच्या विळख्यात असल्याने नागरिकांना नाईलाजाने जीव मुठीत ठेऊन वाहन वर्दळीच्या रस्त्यांवर चालावे लागत आहे. लहान मुलं , विद्यार्थी , वृद्ध , महिला आदींना तर अश्या कोंडीतून मार्ग काढणे जाचक झाले आहे. राजरोस फेरीवाले व हातगाड्या लागत असताना फेरीवाला पथक व प्रभाग समितीचे अधिकारी करतात काय ? असा सवाल लोक करत आहेत . त्यांच्या आर्थिक भ्रष्ट संगनमताशिवाय हे शक्य नसल्याने अश्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे धाडस वरिष्ठ अधिकारी दाखवत नसल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .