शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भाईंदर पश्चिमेचा बेकायदा रविवार बाजार पुन्हा जोमात; वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन देखील महापालिकेची कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 7:51 PM

महापालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे

मीरारोड - भाईंदर पश्चिम येथील मुख्य  रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा रविवार बाजार आज ३ एप्रिलच्या रविवारी पुन्हा जोमात भरला होता . त्यामुळे मुख्य मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती . परंतु महापालिके कडून मात्र कारवाई केली जात नसल्याने बेकायदा बाजाराशी पालिकेचा वरदहस्त असल्याच्या आरोपांना पुन्हा बळ मिळाले आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानका पासुन थेट उत्तन - गोराई र्पयत जाणारा हा एकमेव मुख्य मार्ग आहे . येथून एसटी, एमबीएमटी, बेस्ट आदी सार्वजनिक उपक्रमांच्या बससेवांसह रिक्षा , दुचाकी, चारचाकी, अवजड मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.  परंतु मुख्य रस्त्यावरच  बेकायदा रविवार बाजार मुळे प्रचंड वाहतुक कोंडी होते . लोकांना चालणे अवघड होते . आपत्कालिन वेळेत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे वाहन जाऊ शकत नाही . अर्धा अर्धा तास वाहतुक ठप्प होते व नागरिक  अडकुन पडतात. पालिका मुख्यालय, पोलीस ठाणे ,  बस स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा असतो . फेरीवाले जाताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक व अन्य कचराया रस्त्यात टाकून जातात . प्लास्टिक बंदी असून देखील सर्रास प्लास्टिक पिशव्या आदींचा वापर केला जातो . 

त्यातच भुरटे चोर, पाकिटमारांसह महिला - मुलींची छेड काढणारया रोडरोमीयोंच्या तक्रारी होतात . त्यातच सध्या महापालिकेच्या भुयारी गटारच्या कामा मुळे भाईंदर पोलीस ठाण्या पासून पुढे सुभाषचंद्र बोस मैदान पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे . त्यामुळे आधीच वाहतुकीची कोंडी त्यात बेकायदा रविवार बाजारा मुळे जाच प्रचंड वाढला आहे . 

ह्या बेकायदा रविवार बाजारा विरुद्ध नगरसेवक अवाक्षर काढताना दिसत नाही . बाजार वसुली ठेकेदारसाठी तर हा बाजार बक्कळ शुल्क वसुलीची पर्वणी असतो . त्यात महापालिका बेकायदा बाजरावर ठोस कारवाई करत नसल्याने एकूणच ह्यात भ्रष्टाचारी संगनमत असल्याचे आरोप होत आले आहेत .  मध्यंतरी काही काळ रविवारी सकाळ पासून पालिकेचे पथक या मुख्य मार्गावर फेरीवाल्यांना बसू देत नव्हते . दुपारी पथक जायचे आणि फेरीवाले पुन्हा बसायचे . परंतु त्यामुळे सकाळ ते दुपार दरम्यान मात्र पालिका मुख्यालया सह मुख्य रस्ता , बस स्थानक वर अतिक्रमण होत नसल्याने रस्ते मोकळे व स्वच्छ दिसत होते .  परंतु आजच्या रविवारी मात्र पालिकेच्या पथकाने कारवाई करण्या ऐवजी फेरीवाल्यांना बसण्यास मोकळे रान दिल्याने पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी आणि जाच नागरिकांना सहन करावा लागला . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर