शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

भिवंडीत अकिरा मियावकी संकल्पनेतून साकारले पाहिले घनवन प्रकल्प

By नितीन पंडित | Updated: January 9, 2024 19:00 IST

मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.

भिवंडी : पर्यावरण रक्षणासाठी जंगल वाचविणे गरजेचे असताना शहरातील काँक्रिटच्या जंगलात झाडांचे जंगल निर्माण करण्यासाठी अकिरा मियावकी या जपानी संकल्पनेतून घनवन बनविण्यात येत असून भिवंडी शहरात केशवसृष्टी संस्थेच्या वतीने एचडीएफसी लाईफ इन्श्युरंस कंपनीच्या सीएसआर फंडातून बनविण्यात आलेल्या शहरातील पहिल्या अकिरा मियावकी घनवन प्रकल्प छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील हिंदू स्मशान भूमी येथे मंगळवारी राबविण्यात आला.

मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी एच डी एफ सी लाईफचे मुख्य उपाध्यक्ष सुब्रोतो रॉय,पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हिरवाडे,विठ्ठल ठाके,उपायुक्त दीपक झिंजाड, केशवसृष्टी चे कोषाध्यक्ष नीलकंठ अय्यर,सदस्य शरद बन्सल,पालिका उद्यान विभाग अधीक्षक निलेश संखे, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले,प्रभाग समिती क्रमांक पाच सहाय्यक आयुक्त राजेंद्र वरळीकर,समाजसेवक भूषण रोकडे यांसह मोठ्या संख्येने पालिका अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.शहरात प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून हवेची गुणवत्ता ढासळली आहे.त्यामुळे शहरात छोट्या जागेत अधिकाधिक जंगल निर्माण करण्यासाठी अकिरा मियावकी ही जपानी संकल्पना उपयुक्त ठरणार असून त्यामध्यमातून शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया यावेळी भिवंडी पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिली आहे.

पालिका क्षेत्रातील हिंदू स्मशान भूमीत ११००० चौरस फूट क्षेत्रफळात सुपारी,अशोका, पेरू,कामिनी,जास्वंद,कणेर,सोनचाफा,बहावा, कवट,पारिजात,बेल अशा विविध ५६ प्रजातींची ३५०० झाडे या ठिकाणी केशवसृष्टी संस्थेच्या  माध्यमातून लावण्यात आली असून त्याचे संगोपन पुढील दोन वर्षे पालिका उद्यान विभागा कडून केले जाणार आहे.त्यानंतर येथे घनदाट जंगल होऊन त्यामुळे परिसरातील पर्यावरण समतोल वाढून प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे अशी माहिती आयुक्त अजय वैद्य यांनी दिली असून भविष्यात शहरातील अजून काही ठिकाणे निवडून तेथे असा प्रकल्प संस्थेच्या सहकार्यातून राबविण्यात येणार आहे असे शेवट वैद्य यांनी सांगितले.

टॅग्स :bhiwandiभिवंडी